डॉ. आंबेडकर वसतिगृहाचा पुनर्विकास होणार; घोले रस्त्यावर सातशे विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह

डॉ. आंबेडकर वसतिगृहाचा पुनर्विकास होणार; घोले रस्त्यावर सातशे विद्यार्थी क्षमतेचे वसतिगृह

शिवाजीनगर येथील घोले रस्त्यावरील महापालिकेच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाच्या पुनर्विकासासह वसतिगृहाचा विस्तार होणार आहे. पुनर्विकासानंतर येथे 700 विद्यार्थ्यांची निवासाची सोय होणार आहे. दहा मजली इमारतीच्या या कामाच्या आराखड्याला इस्टिमेट कमिटीने नुकतीच मान्यता दिली.

ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या अल्प उत्पन्न गटातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पन्नास वर्षांपूर्वी घोले रस्त्यावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहाची उभारणी केली होती. येथे 350 विद्यार्थ्यांच्या निवासाची सुविधा उपलब्ध आहे. ही इमारत जुनी आणि जीर्ण झाल्याने येथील जुन्या पध्दतीच्या बांधकाम रचनेमुळे समस्या निर्माण झाल्या होत्या. गेल्यवर्षी वसतिगृहात डेंग्यूची लागण झाल्याने विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखलकेले होते. उपचारादरम्यान एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हॉस्टेलची पाहणी केली. औषध फवारणी आणि तातडीच्या दुरुस्त्यांची कामे देखील केली.

मात्र, इमारतीचे आयुर्मान, देखभाल-दुरुस्तीवरील खर्च आणि भविष्याची गरज लक्षात घेऊन या इमारतीच्या पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार तयार केलेल्या या इमारतीच्या विकास आराखड्याला इस्टीमेट कमिटीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

या असणार सुविधा
वसतिगृहाची जागा सुमारे एक लाख 70 हजार चौ. फूट असून यापैकी 43 हजार चौ. फूट बांधकाम आहे. नवीन रचनेनुसार येथे दोन लाख चौ. फुटांचे बांधकाम करण्यात येणार आहे. सध्या 350 बेड्सची क्षमता असून ती नियोजित वसतिगृहातील बेड्सची क्षमता 700 पर्यंत होणार आहे. तळमजल्यावर पाच मोटारी आणि 248 दुचाकींचे पार्किंग असेल. याच मजल्यावर मीटिंग एरिया, प्रशासन आणि सुरक्षा विभागाचे कार्यालय तसेच वेस्ट मॅनेजमेंटसाठी चार खोल्या आणि दोन स्वच्छतागृह असतील.

जुन्या इमारतीचे आयुर्मान, देखभाल-दुरुस्तीवरील खर्च आणि भविष्याची गरज लक्षात घेऊन पुनर्विकासाचा निर्णय घेण्यात आला. या विकास आराखड्याला इस्टिमेट कमिटीने मान्यता दिल्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. या इमारतीसाठी शासनाच्या समाज कल्याण विभागाकडूनही आर्थिक मदत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे मनपाचे भवन विभागाचे मुख्य अभियंता युवराज देशमुख यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा ‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा
उसाचा रस हा आपल्या आरोग्यासाठी किती चांगला असतो. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. उन्हाळ्यात तर आवर्जून लोकं कोल्ड्रींक्सपेक्षा उसाच्या रसाला...
आधी मसाला स्प्रे मारला मग चाकूने केले वार, त्यानंतर…; पतीकडून अभिनेत्रीला जीवेमारण्याचा प्रयत्न
बिहारमधील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ; आढळून आले नेपाळ, म्यानमाग, बांगलादेशचे नागरिक
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा, मोठा पडदा गाजवणारे दिग्गज खलनायक कोटा श्रीनिवास राव यांचं निधन
मिंधे गटाच्या ‘त्या’ पाच मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर न्यायालयीन चौकशी लावा, संजय राऊत यांची फडणवीसांकडे मागणी
मराठी बोलणार नाही, मला मारून टाकलं तरी चालेल! प्रसिद्ध अभिनेत्याची मुजोरी
लॉर्ड्सवर शेवटच्या षटकात हायव्हॉल्टेज ड्रामा; शुभमन गिलचा रुद्रावतार, सिराजमधला DSP जागा झाला; नेमकं काय घडलं?