शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी कराल तर जेलची हवा, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्देश

शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी कराल तर जेलची हवा, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्देश

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या शॉर्टकट दर्शनासाठी दमबाजी आणि गोंधळ घालणाऱया व्हीआयपी भक्तांवर थेट गुन्हे दाखल करा, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंदिरे समिती आणि पोलीस प्रशासनाला दिले आहेत. दैनिक ‘सामना’ने व्हीआयपी भाविकांच्या झुंडशाहीविरोधात आवाज उठवला होता. या बातमीची दखल घेत जिल्हाधिकाऱयांनी स्थानिक प्रशासनाला लेखी आदेश काढले आहेत.

येत्या 6 जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा पंढरपूर येथे संपन्न होत आहे. दिंड्या आणि पालख्या पंढरपूरकडे वाटचाल करीत आहेत. पालखी सोहळा पंढरीत दाखल होण्यापूर्वी पंढरीनगरी भाविकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. पंढरीत दाखल झालेले वारकरी चंद्रभागा नदीचे स्नान करून श्री विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे देवाच्या पदस्पर्श दर्शनाची रांग मंदिरापासून चार किलोमीटर दूरपर्यंत पोहचल्याने पददर्शनासाठी 12 ते 15 तासांचा अवधी, तर मुखदर्शनासाठी 2 ते 4 तासांचा कालावधी लागत आहे.

दर्शन रांगेतील भाविकांना तत्पर आणि सुलभ दर्शन होण्यासाठी मंदिरे समिती कसोशीने प्रयत्न करीत असताना, यामध्ये व्हीआयपी भाविकांची मोठी आडकाठी येत आहे. दरम्यान, आमदार, खासदार, मंत्री, नेते, पदाधिकारी आदींची मोठी वर्दळ पंढरीत वाढली आहे. या व्हीआयपींबरोबर पन्नास ते शंभर लोक दर्शनासाठी घुसखोरी करीत असल्याने दर्शन रांगेतील भाविकांच्या समस्येत भर पडत आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Maharashtra Monsoon Session 2025 – मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही; नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित Maharashtra Monsoon Session 2025 – मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही; नाना पटोले एक दिवसासाठी निलंबित
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांची सभागृहात जाहीर माफी मागितली पाहिजे. मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही, असे म्हणत...
शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला म्हणून निलंबीत करण्याचा भयानक पायंडा या सरकारने पाडलाय, आदित्य ठाकरे यांची टीका
वजन कमी करण्यासाठी लिंबू आणि मधाचे पाणी पिणे किती फायदेशीर आहे?
नारायण राणे आणि राणे फॅमिलीची चोच नेहमी नरकातच बुडालेली असते! भास्कर जाधव यांनी घेतला समाचार
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे शेफालीला पडले महागात
सरकारला मराठी लोकांनी नमवलं, आम्ही तुमच्या वतीनं…! राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं संयुक्त पत्र
हे करून पहा – प्रवासात उलटी होत असेल तर…