22 तासांत एक लाख भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

22 तासांत एक लाख भाविकांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन, मानाच्या पालख्यांचे सोलापूर जिल्ह्यात आगमन

राज्याच्या कानाकोपऱयातून निघालेल्या दिंडय़ा अन् पालख्यांचा सोहळा सोलापूर जिह्याच्या वेशीवर विसावला असून, पंढरीनगरी वारकरी भाविकांच्या उपस्थितीमुळे गजबजून गेली आहे. चंद्रभागा नदीचे स्नान करून भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. देवाची दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत पोहोचली आहे. एका मिनिटामध्ये 30 भाविकांना पदस्पर्श दर्शन दिले जात असल्याने दिवसभरात 40 हजार भाविकांना पदस्पर्श दर्शन आणि 60 हजार भाविकांना मुखदर्शन, असा एक लाख भाविकांना दर्शनाचा लाभ मिळतो आहे.

आषाढी एकादशीचा सोहळा अवघ्या सात दिवसांवर येऊन ठेपल्याने, पंढरपूरमध्ये वारकऱयांची गर्दी वाढू लागली आहे. मठ, धर्मशाळा, भक्त निवास आणि हॉटेल हाऊसफुल्ल झाली आहेत. शहरातील मोकळी मैदाने, भक्तीसागर, वाळवंट आदी परिसरात भाविकांनी आपल्या मुक्कामाची सोय केली असून, शासनाच्या वतीने शहराच्या विविध भागामध्ये तात्पुरते शेड उभे करून वारकऱयांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

वारकऱयांना मूलभूत सेवा-सुविधांमध्ये कोणतीही कमतरता भासू नये यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पंढरीत तळ ठोकून आहेत. गेल्या महिनाभरापासून वारीचे नियोजन सुरू आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, निवारा, कायदा-सुव्यवस्था, शौचालये, रस्ते, दर्शन व्यवस्था, स्नान व्यवस्था आदींवर अधिक भर देण्यात आला आहे. पालखी सोहळ्यातील गर्दी पाहता या वेळी वारी विक्रमी भरेल, असा प्रशासनाचा अंदाज आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा ‘या’ लोकांसाठी ऊसाचा रस म्हणजे विषच, पिण्याआधी दहावेळा विचार करा
उसाचा रस हा आपल्या आरोग्यासाठी किती चांगला असतो. हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. उन्हाळ्यात तर आवर्जून लोकं कोल्ड्रींक्सपेक्षा उसाच्या रसाला...
आधी मसाला स्प्रे मारला मग चाकूने केले वार, त्यानंतर…; पतीकडून अभिनेत्रीला जीवेमारण्याचा प्रयत्न
बिहारमधील मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ; आढळून आले नेपाळ, म्यानमाग, बांगलादेशचे नागरिक
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीवर शोककळा, मोठा पडदा गाजवणारे दिग्गज खलनायक कोटा श्रीनिवास राव यांचं निधन
मिंधे गटाच्या ‘त्या’ पाच मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर न्यायालयीन चौकशी लावा, संजय राऊत यांची फडणवीसांकडे मागणी
मराठी बोलणार नाही, मला मारून टाकलं तरी चालेल! प्रसिद्ध अभिनेत्याची मुजोरी
लॉर्ड्सवर शेवटच्या षटकात हायव्हॉल्टेज ड्रामा; शुभमन गिलचा रुद्रावतार, सिराजमधला DSP जागा झाला; नेमकं काय घडलं?