आरपारची लढाई… जिंकल्याशिवाय मागे फिरायचे नाही! 29 ऑगस्टला मंत्रालयावर धडक, राज्यव्यापी बैठकीत जरांगेंचा निर्धार

आरपारची लढाई… जिंकल्याशिवाय मागे फिरायचे नाही! 29 ऑगस्टला मंत्रालयावर धडक, राज्यव्यापी बैठकीत जरांगेंचा निर्धार

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आता रणभूमीत उतरून शेवटची आरपारची लढाई जिंकायची आहे. ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. त्यासाठी 27 ऑगस्टला आंतरवाली सराटीतून कूच करणार आणि 29 रोजी मंत्रालयावर धडकणार, असा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी केला. आंतरवाली सराटी येथे आज रविवारी मराठा समाजाच्या राज्यव्यापी बैठकीत ते बोलत होते.

जरांगे म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी सरकारला दोन वर्षांचा वेळ दिला. पण, आता संयम संपला आहे. आता ओबीसीमधूनच आरक्षण घेणार. आता वाशीबिशी नाही, सरळ मुंबईत जायचे आणि  मुंबईत शांततेत आंदोलन करायचे. आम्ही फडणवीसांचे शत्रू नाही. पण, मुंबईकडे जाताना एकाही मराठय़ाला काठी लागली तर मुंबईसह राज्यभरातील मुख्य रस्ते, पाणंद रस्तेसुद्धा मोकळे राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला. आता मैदानही आपणच गाजवायचे आणि गुलालही आपल्याच अंगावर घ्यायचा आहे. त्यामुळे ही आरपारची  लढाई पार करायची असल्याचे ते म्हणाले.

27 ऑगस्टला प्रस्थान

27 ऑगस्टला आंतरवालीतून सकाळी 10 वाजता निघणार असून, शहागड, पैठण फाटा, पैठण, शेवगाव, अहिल्यानगर चौक, पांढरी पूल, आळेफाटा, शिवनेरी गडाचे दर्शन घेऊन, पुढे वाशी, चेंबूरमार्गे 28 रोजी मुबईत पोहोचणार असून, 29 रोजी आझाद मैदान येथे आंदोलन सुरू करणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

काय आहेत मागण्या?

मराठा कुणबी एकच असल्याचा जीआर काढा, हैदराबाद सातारा, बॉम्बे गॅझेटियर लागू करा, मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घ्या, मराठा आंदोलनात बळी गेलेल्यांच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी आणि आर्थिक मदत करा, शिंदे समितीला एक वर्षाची मुदतवाढ द्या, आमच्या सगळ्या मागण्या सरकारकडे आहेत.

मुंबईला जाण्याची तयारी करा

58 लाख नोंदी निघून चार कोटी मराठा आरक्षणात गेले आहेत. उद्यापासून मुंबईला जाण्याची तयारी करा, गावपातळीवरील नेत्यांनादेखील मुंबईला जाण्याचा हट्ट धरा. स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी गावात राहिले तर गुप्त माहिती द्या. आम्ही माघारी आल्यानंतर कोणता नेता गावात राहिला याची माहिती द्या, त्यांना निवडणुकीत पाडलंच म्हणून समजा, असा इशारा जरांगे यांनी दिला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्वयंपाकघरातील हा साधा मसाला म्हणेज व्हिटॅमिन बी 12 चा खजिनाच, याच्यापुढे अंडी, चिकनही फेल स्वयंपाकघरातील हा साधा मसाला म्हणेज व्हिटॅमिन बी 12 चा खजिनाच, याच्यापुढे अंडी, चिकनही फेल
भारतीय स्वयंपाक घरात उपलब्ध असलेला जिरा हा एक असा मसाल्याचा पदार्थ आहे, ज्याचा उपयोग हा फक्त पदार्थांची चव वाढवण्यासाठीच नाही...
Bullet Train : आता बिहारमध्ये धावणार बुलेट ट्रेन, मुंबई अहमदाबाद मार्गावर चालणार वंदे भारत ट्रेन
मला हा खटला निकालात काढायचा आहे! न्यायाधीशांनी केलं स्पष्ट, ऑगस्टमध्ये होणार शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणावर सुनावणी
पहलगाममध्ये झालेला हल्ला हा सुरक्षा व्यवस्थेत झालेली चूक, जम्मू कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतली जबाबदारी
San Rechal – मिस वर्ल्ड ‘ब्लॅक ब्यूटी’ सॅन रेचेलनं उचललं टोकाचं पाऊल, आर्थिक तंगीमुळं जीवन संपवलं
पावसाळ्यात तोंडली खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, वाचा
कलेची आणि कलाकारांची किंमत नाही! असे म्हणत अनुराग कश्यप का आणि कुणावर भडकला?