2025 वरीस धोक्याचं, 61 हजार नोकऱ्या गमावल्या
2025 हे वर्ष टेक कंपन्यांसाठी धोक्याचं ठरत आहे. अवघ्या पाच महिन्यांत वेगवेगळ्या कंपन्यांमधील जवळपास 61 हजार कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी नोकरकपात केली आहे, त्यामध्ये मायक्रोसॉफ्ट, आयबीएम, गुगल आणि अॅमेझॉनसारख्या आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. टेक कंपन्या सातत्याने कर्मचारी कपात करत असल्याने या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ही कर्मचारी कपात एआयमुळे केली जात असल्याची धक्कादायक माहितीसुद्धा समोर आली आहे. मायक्रोसॉफ्टने मे 2025 मध्ये तब्बल 6 हजार कर्मचाऱ्यांना घरी बसवले आहे. या कर्मचाऱ्यांच्या जागी आता एआय काम करणार आहे. गुगल कंपनीनेही बिझनेस युनिटमधून 200 कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे.
अॅमेझॉनने मे महिन्यात डिव्हायसेस आणि सर्व्हिसेस युनिटमधून 100 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कंपनीतून काढून टाकले. अॅमेझॉनने तीन वर्षांत एकूण 27 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. एआयने आतापर्यंत शेकडो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या खाल्ल्या असून वर्ष संपेपर्यंत आणखी किती नोकऱ्या खाणार आहे, हे वर्षअखेर स्पष्ट होईल, परंतु कर्मचारी त्याआधीच प्रचंड धास्तावले आहेत.
नागपूर येथील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज (एनएफसी) मधील फायर इंजिनीअरिंगमधील बी-टेक विद्यार्थ्यांची 28 वी तुकडी पासआऊट झाली. या वेळी विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या संचलन केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. पासआऊट झालेल्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांनी तोंडभरून कौतुक केले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List