तेंडुलकरांच्या दमदार लेखणीनेच ‘सामना’ चित्रपटाला यश, 50 वर्षेपूर्तीचा रंगला सोहळा

तेंडुलकरांच्या दमदार लेखणीनेच ‘सामना’ चित्रपटाला यश, 50 वर्षेपूर्तीचा रंगला सोहळा

विजय तेंडुलकरांसारख्या ज्येष्ठ नाटककाराकडे चित्रपट लिहिण्यासाठी हट्ट धरणे आणि तेंडुलकरांसारख्या नाटककाराने देखील ग्रामीण महाराष्ट्राचे राजकारण समजून घेत तो हट्ट पुरवणे आणि त्यातून ‘सामना’सारखा चित्रपट निर्माण होणे, यामागे केवळ तेंडुलकरांच्या दमदार लेखणीचेच यश आहे, असे मत ज्येष्ठ वात्रटिकाकार आणि ‘सामना’ चित्रपटाचे निर्माते रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले.

सामना’ या चित्रपटास 50 वर्षे झाल्यानिमित्त आयोजित केलेल्या परिसंवादात फुटाणे बोलत होते. यावेळी ‘कोहिनूर कट्टा’चा शुभारंभ करण्यात आला. प्रसंगी माजी पेंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, कोहिनूर ग्रुपचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्राव, गौरव फुटाणे, सतीश जकातदार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी विजय तेंडुलकर, निळू फुले, डॉ. श्रीराम लागू आणि भास्कर चंदावरकर यांच्या स्मरणार्थ पहिला ‘साहित्य कला गौरव सामना सन्मान’ ‘वाळवी’ या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटास प्रदान करण्यात आला. परिसंवादात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, विलास रकटे, निर्माते रामदास फुटाणे, परेश मोकाशी सहभागी झाले होते. सूत्रसंचालन ज्येष्ठ समिक्षक दिलीप ठाकूर यांनी केले. रामदास फुटाणे म्हणाले की, मी साधा चित्रकलेचा शिक्षक म्हणून नोकरी करीत असताना माझ्या हाताखालून गेलेले विद्यार्थी हे साखर कारखान्याचे राजकारण आणि समाजकारण यशस्वीपणे चालवत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत चिडून मी नोकरी सोडली आणि चित्रपट क्षेत्रात आलो.

डॉ. मोहन आगाशे म्हणाले, कोणताही चित्रपट यशस्वी होण्यामागे संहितेची आशयघनता हे महत्त्वाचे अंग असते की, जे ‘सामना’ या चित्रपटाला लाभले आहे.

सुशिलकुमार शिंदे म्हणाले की, हुल्लडबाज चित्रपटांच्या तुलनेत ध्येयवादी चित्रपटांना कमी प्रतिसाद मिळतो. परंतु, दूरदृष्टीच्या कसोटीवर पाहिल्यास ध्येयवादी चित्रपटच टिकून राहतात.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

क्या हुआ तेरा वादा? शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी उद्यापासून शिवसेनेचे मराठवाड्यात आंदोलन क्या हुआ तेरा वादा? शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी उद्यापासून शिवसेनेचे मराठवाड्यात आंदोलन
सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक प्रचारात महायुती सरकारने शेतकर्‍यांना अनेक आमिषे दाखवली होती. मात्र सत्ता मिळताच शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणार्‍या सरकारला शिवसेना ‘क्या...
निवृत्तीनंतर न्यायमूर्तींनी राजकारणात प्रवेश करणं न्यायव्यवस्थेच्या स्वायत्ततेवर आणि निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं, सरन्यायाधीशयांनी व्यक्त केली चिंता
Bangalore Stampede : 35 हजार क्षमतेच्या स्टेडियममध्ये 3 लाख चाहते पोहोचले, बंगळुरूतील चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढला
बँकाचे हजारो कोटी बुडवणाऱ्या व्यावसायिकाला गुजरात उच्च न्यायालयाने दिली परदेशी जाण्याची परवानगी
Beauty Tips- सुंदर दिसण्यासाठी इतके पाणी प्यायलाच हवे
Ratnagiri News – भाट्ये समुद्रकिनारी सापडले निळ्या रंगाचे मुळे
श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी टोकन पध्दत सुरू, भाविकांना दर्शनपासाचे करावे लागणार ऑनलाईन बुकींग