हिंदुस्थानचा दुसरा वॉटर स्ट्राईक, बगलिहार धरणाचे पाणी रोखले

हिंदुस्थानचा दुसरा वॉटर स्ट्राईक, बगलिहार धरणाचे पाणी रोखले

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी केली आहे. सिंधू जलकरार रद्द करत पहिला मोठा धक्का दिला. त्यानंतर आता दुसरा वॉटर स्ट्राईक केला असून चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह रोखला आहे. तसेच झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचेही पाणी थांबवण्याचा निर्णय घेण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.

जम्मूतील रामबन येथील बगलिहार धरण आणि उत्तर कश्मीरमधील किशनगंगा धरणाद्वारे पाकिस्तानकडे जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाचे नियमन हिंदुस्थान करू शकतो. म्हणजेच या धरणांद्वारे पाकिस्तानला जाणारे पाणी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय थांबवता येते किंवा प्रवाह वाढवता येतो. तरीही बागलिहार धरण हा दोन्ही देशांमधील दीर्घकाळापासून वादाचा विषय आहे. पाकिस्तानने यावर जागतिक बँकेकडून मध्यस्थीची मागणी केली होती. किशनगंगा धरणाचाही असाच वाद आहे.

– पाकिस्तान सिंधू नदीतील 93 टक्के पाणी सिंचन आणि वीजनिर्मितीसाठी वापरतो. पाकिस्तानची सुमारे 80 टक्के शेतजमीन आणि याच पाण्यावर अवलंबून आहे. शेती हा पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे हिंदुस्थानने सिंधू करार रद्द करण्याचा निर्णय घेतल्यापासून पाकिस्तान सातत्याने युद्धाच्या धमक्या देत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट? धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर, 15 मे पर्यंत वेट अँड वॉच मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट? धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर, 15 मे पर्यंत वेट अँड वॉच
मुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचे संकट ओढावणार आहे. कारण मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून...
Maharashtra Breaking News LIVE 5 May 2025 : अजितदादा भाजपसोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत- संजय राऊत
“लग्नानंतर निवेदिताला त्या कारणासाठी चांगलंच झापलेलं”; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
लग्नाच्या 5 महिन्यांत सोभिताने दिली गुड न्यूज? प्रेग्नंसीच्या चर्चांमागील सत्य काय?
प्रर्थाना बेहरेनं केलं नव्या पाहुण्यातं स्वागत, चिमुकल्यासोबत फोटो पोस्ट करत म्हणाली, ‘माझं बाळ…’
भारत-पाकिस्तान वादादरम्यान अभिनेत्रीचा मोठा निर्णय; स्वत:च्याच चित्रपटाचे सर्व..
पहलगाम हल्ला, पोलिसांत तक्रार…, ‘त्या’ एका वक्तव्यामुळे सोनू निगमचं करीयर संकटात?