मंत्रालयातील दलालांनी गद्दारांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी चढ्या दराने विकण्याचा डाव आखलाय – अंबादास दानवे

मंत्रालयातील दलालांनी गद्दारांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी चढ्या दराने विकण्याचा डाव आखलाय – अंबादास दानवे

पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाविरोधात सात गावांतील शेतकरी एकवटले असून, त्यांनी भूसंपादनाला कडाडून विरोध केला. हा विरोध मोडून काढण्यासाठी शनिवारी पोलिसांनी कुंभारवळण येथे शेतकऱ्यांवर बेफाम लाठीमार केला. पोलिसांनी केलेल्या हल्ल्याने घाबरलेल्या एका ज्येष्ठ महिलेचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या अंजनाबाई कामठे यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी आयोजित शोकसभेत बोलताना अंबादास दानवे यांनी सत्ताधाऱ्यांना देखील फटकारले आहे.

”शेतकऱ्यांच्या परवानगी विरोधात पुरंदर विमानतळासाठी अधिग्रहित करण्यात येत असलेल्या शेत जमिनी प्रकरणी आज येथील शेतकरी व परिसरातील ग्रामस्थांशी चर्चा व संवाद साधला. मंत्रालयातील काही दलालांनी येथील गद्दारांना हाताशी धरून गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्त दरात घेऊन नंतर चढ्या दराने विकण्याचा डाव आखला आहे. पुण्याचे विमानतळ येथून 36 किलोमीटर असताना येथे विमानतळाची काय आवश्यकता. विमानतळाची आवश्यकताच असेल तर बारामती येथे विमानतळ असून त्याचे विस्तारीकरण करण्यात यावे. पुरंदरला विमानतळाची आवश्यकता नसून विनाकारण शेतकऱ्यांच्या सुपीक आणि पिकाऊ जमिनी बळकावून हे विमानतळ करू नये. त्यामुळे शासनाने हा निर्णय रद्द करावा” अशी भूमिका यावेळी अंबादास दानवे यांनी मांडली.

याप्रसंगी शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर, उपनेत्या सुषमा अंधारे,जिल्हाप्रमुख उल्हास शेवाळे, तालुकाप्रमुख अभिजीत जगताप,जेजुरी शहरप्रमुख किरण दावलकर,सासवड शहर प्रमुख, राजेंद्र जगताप, उप तालुका राजेंद्र क्षीरसागर, शुभम झिंजुरके, कुंभारवळगावाचे सरपंच मंजुश्रीताई गायकवाड, उपसरपंच संदिप कामटे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;