हार मानायची नाही…! मुलगा दहावीत सर्व विषयांत नापास होऊनही पालकांकडून जंगी पार्टी

हार मानायची नाही…! मुलगा दहावीत सर्व विषयांत नापास होऊनही पालकांकडून जंगी पार्टी

सर्वसामान्य पालक आपल्या पाल्यांच्या यशाचा आनंद जोरदार साजरा करतात. मात्र कर्नाटकात एका जोडप्याने चक्क मुलगा नापास झाल्याचे सेलिब्रेशन केले आहे. मुलगा दहावीच्या परीक्षेत सर्व विषयात नापास झाला. मात्र मुलाच्या अपयशाबाबत मुलाला रागावण्याऐवजी पालकांनी जंगी पार्टी केली. मुलगा नापास झाल्यानंतर केक कापून सेलिब्रेशन केले.

कर्नाटकातील बागलकोट येथील एका खाजगी शाळेतील अभिषेक याने राज्य बोर्ड परीक्षेत 625 पैकी फक्त 200 गुण मिळवले. तो कोणत्याही विषयात उत्तीर्ण होऊ शकला नाही. परंतु याबाबत त्याच्यावर रागवण्याऐवजी त्याच्या पालकांनी त्याचे मनोबल उंचावण्याचा निर्णय घेतला. त्यांनी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पुढच्या प्रयत्नात चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी केक आणि मिठाई मागवली.

परीक्षेत नापास झाला असला तरी अभिषेकने परीक्षेला गांभीर्याने घेत प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. या सेलिब्रेशनमुळे अपयशामुळे आलेली निराशा दूर करण्यास मदत झाली, असे कुटुंबाने सांगितले. दरम्यान, पुढच्या प्रयत्नात मी सर्व विषय उत्तीर्ण करेन, असा दृढनिश्चय अभिषेकने बोलून दाखवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

काँग्रेस फोडा अन् काँग्रेसला रिकामी करा काँग्रेस फोडा अन् काँग्रेसला रिकामी करा
काँग्रेस पक्षाला कोणतेही धोरण नाही. त्यामुळे काँग्रेसला लोक सोडून चालली आहेत. काँग्रेस फोडा अन् काँग्रेसला रिकामी करा, असा कानमंत्र देत...
IPL 2025 कोलकात्याने सामना जिंकला, परागने मने!रियानचे शतक हुकल्याने चाहते हळहळले
बळीराजाच्या गळ्याभोवती कर्जाचा फास, तरीही महायुती सत्तेच्या धुंदीत मस्त;तीन महिन्यांत 267 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांविरोधात फसवणुकीची तक्रार
रुद्राक्षाची माळ जपण्यावरून वाद धावत्या अवंतिका एक्प्रेसमध्ये ठाण्यातील महिलेवर मुस्लिम टोळक्याचा ब्लेडहल्ला
शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयात बुधवारी सुनावणी, दीड वर्षानंतर मुहूर्त
हिंदुस्थानचा दुसरा वॉटर स्ट्राईक, बगलिहार धरणाचे पाणी रोखले