चारकोपमध्ये आग नियंत्रणासाठी शिवसैनिक धावले, चाळीतील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले

चारकोपमध्ये आग नियंत्रणासाठी शिवसैनिक धावले, चाळीतील रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले

चारकोपच्या एकतानगरमध्ये शनिवारी रात्री दुकानाला लागलेल्या आगीत शिवसैनिक मदतीला धावले. शिवसैनिकांनी चाळीतील सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले तसेच तातडीने सर्व वीज यंत्रणा बंद करून आगीचा भडका उडेल असे घरगुती गॅस सिलिंडर्स बाहेर काढले. आधीच संपर्क करण्यात आलेल्या पोलीस आणि अग्निशमन यंत्रणांना तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. शिवसैनिकांच्या या प्रसंगावधानाने पुढील मोठा अनर्थ टळला.

एकतानगरमध्ये दुकानाला आग लागल्याची माहिती कळताच शाखाप्रमुख विजय मालुसरे हे शाखा क्रमांक 20 आणि 21 मधील सर्व शिवसैनिकांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने पोलीस, अदानी वीज कंपनीचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाला संपर्क करून एकमजली चाळीतील दुकानाला लागलेल्या आगीची माहिती दिली. पोलीस, अग्निशमन अधिकारी येईपर्यंत त्यांनी चाळीतील सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे घराबाहेर काढले तसेच चाळीची वीज यंत्रणा आणि त्याचबरोबर प्रत्येकाच्या घरातील गॅसचे सिलिंडर्स बाहेर काढण्यास मदत केली.

यावेळी विधानसभा समन्वयक अभिषेक दळवी, विधानसभा संघटक राजन निकम, उपविभागप्रमुख श्याम मोरे, विधानसभा निरीक्षक अभिषेक शिर्के यांच्यासह शाखा क्र 20 आणि 21 मधील पदाधिकाऱ्यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट? धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर, 15 मे पर्यंत वेट अँड वॉच मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट? धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर, 15 मे पर्यंत वेट अँड वॉच
मुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचे संकट ओढावणार आहे. कारण मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून...
Maharashtra Breaking News LIVE 5 May 2025 : अजितदादा भाजपसोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत- संजय राऊत
“लग्नानंतर निवेदिताला त्या कारणासाठी चांगलंच झापलेलं”; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
लग्नाच्या 5 महिन्यांत सोभिताने दिली गुड न्यूज? प्रेग्नंसीच्या चर्चांमागील सत्य काय?
प्रर्थाना बेहरेनं केलं नव्या पाहुण्यातं स्वागत, चिमुकल्यासोबत फोटो पोस्ट करत म्हणाली, ‘माझं बाळ…’
भारत-पाकिस्तान वादादरम्यान अभिनेत्रीचा मोठा निर्णय; स्वत:च्याच चित्रपटाचे सर्व..
पहलगाम हल्ला, पोलिसांत तक्रार…, ‘त्या’ एका वक्तव्यामुळे सोनू निगमचं करीयर संकटात?