अटी शिथिल, मुदत वाढवूनही माहुलच्या घरांना अल्प प्रतिसाद; दीड महिन्यात केवळ 231 कर्मचाऱ्यांचे अर्ज

अटी शिथिल, मुदत वाढवूनही माहुलच्या घरांना अल्प प्रतिसाद; दीड महिन्यात केवळ 231 कर्मचाऱ्यांचे अर्ज

मुंबई महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी स्वस्तात उपलब्ध करून दिलेल्या माहुलच्या घरांसाठी अटी शिथिल करून तीनदा मुदतवाढ देऊनही घरांना अल्प प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या दीड महिन्यात 231 कर्मचाऱ्यांनी घरांसाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे माहुलमधील 9 हजार 98 घरांच्या विक्रीचे मोठे आव्हान आता पालिकेसमोर उभे राहिले आहे.

माहुलमधील सदनिकांमध्ये प्रकल्पबाधित राहायला जात नसल्याने तब्बल 13 हजार घरे रिकामी आहेत. त्यापैकी 9 हजार 98 घरे ही पालिका कर्मचाऱ्यांना 12 लाख 60 हजार रुपये किमतीत मालकी तत्त्वावर विकण्यास पालिका तयार झाली असून त्यासाठी कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. मात्र 15 मार्चपासून आतापर्यंत केवळ 231 कर्मचाऱ्यांनी पालिकेकडे अर्ज केले आहेत.

कर्मचारी वसाहतींमध्ये राहणारे करू शकतात अर्ज 

पालिकेकडून 15 मेपर्यंत मुदत वाढवण्यात आली आहे. शिवाय काही अटीही शिथिल केल्या आहेत. यात क्लास वन अधिकारी सोडून सर्व अधिकारी घरांसाठी पात्र असतील तसेच कर्मचारी वसाहतींमधील कर्मचाऱ्यांनाही घरासाठी अर्ज करता येणार आहे, मात्र घर खरेदी केल्यावर कर्मचारी वसाहतीमधील घर सोडावे लागणार आहे. मात्र निकषामध्येही अनेक बदल करूनही पालिकेला कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद मिळालेला नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘बाबनकुळे यांना लाज वाटली पाहिजे’ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊत संतापले ‘बाबनकुळे यांना लाज वाटली पाहिजे’ चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊत संतापले
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. तुम्ही काँग्रेस पक्ष फोडा, रिकामा करा, असा संदेश बावनकुळे यांनी दिला....
अजित पवार यांना शरद पवार कधीच माफ करणार नाही…संजय राऊत यांनी असे का म्हटले?
पाकिस्तानचा उदो-उदो करणाऱ्या राखी सावंतला भारतातून हाकला; मनसे आक्रमक
“विविध ठिकाणी घेऊन जाऊन सतत..”; महिलेकडून एजाज खानवर बलात्काराचे आरोप, गुन्हा दाखल
‘देऊळ बंद’मधील चिमुकली आठवतेय? राघव शास्त्रीचा पासवर्ड गायब करणारी ‘ती’ आता दिसते अशी
इन्स्टाग्रामवरील मेसेजमुळे भवानीनगरमध्ये तरुणाचा खून, सोशल मीडियामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली
HSC Result 2025 – बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनी मारली बाजी; कोकण विभाग अव्वल, तर लातूर खालून पहिला