डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे 19 व्या वर्षी आले अपंगत्व; अंथरुणाला खिळलेल्या तरुणाने ठोठावले हायकोर्टाचे दार

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे 19 व्या वर्षी आले अपंगत्व; अंथरुणाला खिळलेल्या तरुणाने ठोठावले हायकोर्टाचे दार

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे वयाच्या 19व्या वर्षी अपंगत्व आलेल्या तरुणाने एक कोटी रुपये नुकसानभरपाईची मागणी करत उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. सुधीर हिरचंद्र भोसले असे या तरुणाचे नाव आहे.  अॅड. आशिष गायकवाड यांच्यामार्फत त्याने याचिका दाखल केली आहे. न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. अंथरुणाला खिळलेल्या सुधीरची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरांची समिती स्थापन करावी. या समितीने त्यांचा अहवाल न्यायालयात सादर करावा, अशी मागणी अॅड. गायकवाड यांनी केली.

सुधीर आता नेमका कुठे आहे, अशी विचारणा न्यायालयाने केली. सुधीर सध्या पंढरपूरला आहे. त्याला रुग्णवाहिकेतून आणण्याची व्यवस्था केली जाईल, अशी हमी अॅड. गायकवाड यांनी दिली. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने जे.जे. रुग्णालयाला  सुधीरची वैद्यकीय चाचणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. यावरील पुढील सुनावणी 16 जून 2025 रोजी होणार आहे.

डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी

मिरज येथील स्वस्तीयोग प्रतिष्ठान रुग्णालयातील डॉक्टरांमुळे मला कायमचे अपंगत्व आले आहे. याची सविस्तर चौकशी करुन दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी सुधीरने याचिकेत केली आहे. डॉ. मिलिंद कुलकर्णी, डॉ. सुनील कुलकर्णी डॉ. शेखर मालवे यांच्यावर ही कारवाईची मागणी करण्यात आली आहे

रुग्णालयातील कागदपत्रे जळाली

पोलिसांत याची तक्रार करण्यात आली. स्थानिक सरकारी रुग्णालयाकडून सुधीरची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पाच डॉक्टरांची समिती नेमण्यात आली. समितीने सुधीरला डॉक्टरांना चौकशीसाठी बोलावले नाही. 2019 मध्ये लागलेल्या आगीत सर्व कागदपत्रे जळाल्याचे रुग्णालयाने समितीला पत्र लिहून कळवले. कागदपत्रांअभावी या प्रकरणात निष्काळजीपणा झाला आहे की नाही हे सांगणे कठीण असल्याचा अहवाल समितीने दिला. हा अहवाल रद्द करण्याची मागणीदेखील याचिकेत करण्यात आली आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट? धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर, 15 मे पर्यंत वेट अँड वॉच मुंबईकरांवर पाणीकपातीचे संकट? धरणांतील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर, 15 मे पर्यंत वेट अँड वॉच
मुंबईकरांवर लवकरच पाणी कपातीचे संकट ओढावणार आहे. कारण मुंबईत पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. गेल्या काही दिवसांपासून...
Maharashtra Breaking News LIVE 5 May 2025 : अजितदादा भाजपसोबत राहून मुख्यमंत्री होणार नाहीत- संजय राऊत
“लग्नानंतर निवेदिताला त्या कारणासाठी चांगलंच झापलेलं”; अशोक सराफ यांनी सांगितला किस्सा
लग्नाच्या 5 महिन्यांत सोभिताने दिली गुड न्यूज? प्रेग्नंसीच्या चर्चांमागील सत्य काय?
प्रर्थाना बेहरेनं केलं नव्या पाहुण्यातं स्वागत, चिमुकल्यासोबत फोटो पोस्ट करत म्हणाली, ‘माझं बाळ…’
भारत-पाकिस्तान वादादरम्यान अभिनेत्रीचा मोठा निर्णय; स्वत:च्याच चित्रपटाचे सर्व..
पहलगाम हल्ला, पोलिसांत तक्रार…, ‘त्या’ एका वक्तव्यामुळे सोनू निगमचं करीयर संकटात?