तंदूर रोटीसाठी भरमंडपात वऱ्हाडी भिडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण; दोघांचा मृत्यू

तंदूर रोटीसाठी भरमंडपात वऱ्हाडी भिडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण; दोघांचा मृत्यू

तंदूर रोटीवरून भरमंडपात वऱ्हाड्यांमध्ये हाणामारी झाली. यात दोघांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. रवी कुमार उर्फ​कल्लू (18) आणि आशिष कुमार (17) अशी मयतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे लग्न मंडपात शोककळा पसरली.

अमेठीतील बलभद्र पुर गावातील रहिवासी रामजीवन वर्मा यांच्या मुलीचे लग्न होते. लग्नाचे जेवण सुरू झाले. स्वयंपाक्यांनी तंदुरी रोट्या ठेवताच, रवी कुमार आणि आशिष कुमार यांच्यात आधी रोट्या कोणाला घ्यायच्या यावरून भांडण झाले.

हा वाद विकोपाला गेला आणि दोन्ही तरुणांनी एकमेकांना काठ्या आणि रॉडने मारहाण केली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. आशिष वर्मा याचा जागीच मृत्यू झाला तर रवी याचा लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

घटनेनंतर तात्काळ पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम जेव्हा शाहरुख आणि फराह खान यांनी मिळून काजोलची मस्करी केली, लपून छपून केले असे काम
हिंदी सिनेमात काही जोड्या प्रेक्षकांना खूपच आवडतात. कलाकारांची ही केमिस्ट्री अशी जुळून आलेली असते की अशा जोड्यांचे चित्रपट खूपच प्रसिद्ध...
काही लोक भीती निर्माण करतात; पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला प्रकाश राज यांचा पाठिंबा
बेडरुममध्ये प्रायव्हसी, मोठी बाग अन् आलिशान बंगला, रिंकू राजगुरूचं घर कसंय माहितीय का?
मंत्रालयातील दलालांनी गद्दारांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या जमिनी चढ्या दराने विकण्याचा डाव आखलाय – अंबादास दानवे
चंद्रपूरमध्ये वादळीवाऱ्यासह गारपीट, दुबार पिकांना फटका
Ratnagiri News – रत्नागिरीत बाल अंतराळवीरांची सायकल सैर, किड्स सायक्लोथॉनचे यशस्वी आयोजन
विमानतळावर लँडिंग करताना तांत्रिक बिघाड, सुरक्षा भिंतीवर आदळल्याने विमानाला अपघात