‘चंद्र कुठे आहे बघून गावातला मुक्काम वाढवला…’; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला

‘चंद्र कुठे आहे बघून गावातला मुक्काम वाढवला…’; आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना खोचक टोला

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मला वाटतं त्यांनी गावातील मुक्काम वाढवला आहे, तापमान वाढलं आहे, मात्र चंद्र कुठे आहे? ते बघून अजून दोन दिवस ते गावात काढणार आहेत, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे. तसेच मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीची चर्चा सुरू झाली आहे, यावर देखील त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली.

नेमकं काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. मला वाटतं त्यांनी गावातील मुक्काम वाढवला आहे, तापमान वाढलं आहे, मात्र चंद्र कुठे आहे? ते बघून अजून दोन दिवस ते गावात काढणार आहेत, असा हल्लाबोल यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान एका मुलाखतीमध्ये बोलताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या युतीसंदर्भात मोंठं वक्तव्य केलं होतं. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं, त्यानंतर आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र दुसरीकडे युतीसंदर्भात काही बोलू नका असे आदेश राज ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत, यावर देखील आदित्य ठाकरे  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. साद प्रतिसाद आहे पण वाद नाही. दोन पक्षप्रमुख बोलल्यानंतर त्यावर आता कार्यकर्त्यांनी बोलायची गरज नाही, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

यावेळी बोलताना रस्ते आणि नालसफाईवरून देखील आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. नालेसफाई झालेली नाही, पण तिजोरी मात्र सफाई झाली आहे. पोईसर नदीचा फोटो समोर आला आहे. मिठी नदी सुद्धा अस्वच्छ आहे, महापालिकेने पावसाळ्यापूर्वी या संदर्भात बैठक घेतली पाहिजे, अशी मागणी देखील यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुष्पा 2 च्या  ब्लॉकबस्टर यशानंतर सुपरस्टार झालास, आता नवी ओळख काय असेल? पाहा अल्लू अर्जुन काय म्हणाला? पुष्पा 2 च्या ब्लॉकबस्टर यशानंतर सुपरस्टार झालास, आता नवी ओळख काय असेल? पाहा अल्लू अर्जुन काय म्हणाला?
पुष्पा पार्ट 1 आणि पुष्पा पार्ट 2 या दोन्ही चित्रपटांनी अभिनेता अल्लू अर्जुनला एक वेगळी ओळख मिळून दिली. या चित्रपटांमुळे...
मैं झुकेगा नहीं साला…पुष्पाच्या या जगप्रसिद्ध डायलॉग मागे कोण? अल्लु अर्जुन याने सांगितले
Allu Arjun In Waves Summit 2025 : सिक्स पॅक करण्यासाठी हिरोईनकडून घेतली प्रेरणा, अल्लू अर्जुननं सांगितलं फिटनेसचं महत्त्व!
WAVES 2025: भारत डिजिटल क्रांतीचे…; श्रद्धा कपूरने घेतली इंस्टाग्राम प्रमुखांची भेट
Blue Tea : हृदयविकार असलेल्यांनी ब्लू टी प्यायल्यास काय होतं? जाणून घ्या
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची मुलगी शांताबाई साठे यांचे निधन
मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत तक्रार दाखल