शरद पवार- अजित पवार एकत्रच…संजय राऊत यांचा नेमका दावा काय?

शरद पवार- अजित पवार एकत्रच…संजय राऊत यांचा नेमका दावा काय?

अजित पवार आणि शरद पवार एकत्र आलेलेच आहे. आम्हाला आतापर्यंत कधी कोणाला एकत्र पहिले का? भेटताना, बोलताना, चहा घेताना आम्हाला कोणी पाहिले का? नाही ना…आम्ही नाही भेटणार.. आमच्याकडे वसंतदादा संस्था नाही. आमच्याकडे रयत शिक्षण संस्था नाही. बंद खोली दरम्यान आम्ही बसलो नाही, असे काही नाही. तो त्यांचा प्रश्न आहे, असे शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. शरद पवार आणि अजित पवार यांनी एकत्र यावे, असे ट्विट रोहित पवार यांनी केले होते. त्याबद्दल संजय राऊत यांनी मत मांडले.

शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन्ही पक्ष कमकुवत झाले आहेत. त्यामुळे दोन शून्ये एकत्र केली तरी बेरीज शून्यच होते, अशी जोरदार टीका शिवसेनेचे उपनेते व प्रवक्ते संजय निरुपम यांनी केली होती. त्याला शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी जोरदार उत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले, शून्य अधिक शून्य म्हणजे शून्यच होते, असे म्हणणारे XX आहेत. त्यांना दोन भाऊ एकत्र नको आहे. असे जे बोलत आहे त्यांचा मेंदू गुडघ्यात सुद्धा नाही. त्यांच्या मनात केवळ द्वेष आहे. त्यांची सत्ता जाणार, त्या भीतीतून ते बोलत आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषेचा वादावर शिवसेना उबाठा व मनसेवर टीका केली होती. इंग्रजीचे कौतूक केले जाते, पण हिंदी सारख्या भारतीय भाषेला विरोध केला जात असल्याचा टोला त्यांनी लगावला होता. त्यालाही संजय राऊत यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले, फडणवीस यांनी भारतीय परराष्ट्र सेवेचा कारभार हिंदूतून करावा. चीन, जपान या देशांसारखा हिंदीतून कारभार सुरु केला जावा.

देशाच्या संसदेत ७० टक्के लोक इंग्रजीत बोलतात, त्यांना हिंदीतून बोलण्यास सांगावे. हा एक प्रयोग एका सत्रामध्ये करुन बघा मग कळेल. देवेंद्र फडणवीस वेगळे अजेंडा राबवू इच्छीत आहे. त्यांच्या प्रत्येक अजेंडामागे निवडणुकीचे राजकारण आहे. महाराष्ट्रात सर्वांना हिंदी येते. महाराष्ट्रात हिंदीच्या अनेक घडामोडींचे स्थान महाराष्ट्र आहे. हिंदी चित्रपटसृष्टीचा उगम येथे होतो. आम्ही हिंदू पाहतो, हिंदी ऐकतो मग आमच्यावर हिंदी सक्ती का करत आहे, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

महाराष्ट्रात हिंदीची जबरदस्ती करण्याची गरज नाही, हा लोकांचा दबाव होतो. त्या दबावातून आता हिंदी सक्ती मागे घेतली गेली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत अमेरिकेत विधान केले. त्या विधानाचे समर्थन राऊत यांनी केले.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम Kokan News – प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणार बक्षीस; सृजन सायन्स सेंटरचा अभिनव उपक्रम
देवरुख शहरातील सृजन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटी सेंटरतर्फे कचरा निर्मूलन मोहीम स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत...
परतीच्या पावसाने कापलेली भात शेती पुन्हा रुजली, ऑक्टोबर महिना संपला तरीही पाऊस सुरूच
Kokan News – देवरुख येथील सृजन विज्ञान केंद्रात आली अवकाश शास्त्राची नवीन मॉडेल्स
किशोरवयीन मुलांना AI ची भुरळ, वैद्यकीय माहिती आणि रोमान्ससाठी AI चा अधिक वापर!
सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ, 5 रुपयांची दिली मदत; विजय वडेट्टीवार यांच्याकडून संताप व्यक्त
…असा असेल सत्याचा मोर्चा; सर्वपक्षीय बैठकीनंतर अनिल परब यांनी दिली माहिती
तुम्ही पण फ्रिजमध्ये ठेवलेला शिळा भात पुन्हा गरम करून खाता का? मग हे वाचाच; जाणून आश्चर्य वाटेल