पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आजपासून आंदोलन

पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आजपासून आंदोलन

बदलत्या हवामानाचा फटका तळा तालुक्यातील आंबा बागायतदारांना बसला. त्याचबरोबर मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पीक विम्याचे पैसे हाती येतील अशी अपेक्षा होती. अधिकाऱ्यांनी आश्वासनही दिले होते. पण प्रत्यक्षात फुटकी कवडी मिळालेली नाही. अखेर शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. उद्या १९ नव्हेंबरपासून तळा तहसील कार्यालयासमोर शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते बेमुदत उपोषण करणार आहेत.

आंबा पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही वितरित झालेले नाही. यासंदर्भात कृषीमंत्री दत्ता भरणे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक झाली होती. कृषी आयुक्त, पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. ५ नोव्हेंबरपर्यंत पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील, असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले होते. पण अद्यापपर्यंत पैसे मिळाले नाहीत. सरकारने आपला शब्द पाळला नसल्याने तळा तालुक्यातील शेतकरी प्रचंड संतापले आहेत. उद्यापासून सुरू होणाऱ्या उपोषणाच्या माध्यमातून हे शेतकरी आपला रोष व्यक्त करणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी ‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी
बऱ्याचदा आपण चवीच्या हव्यासापोटी अनेकदा जंकफुडचे सेवन करतो. पण या सर्वांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अशातच सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन...
अक्रोड भिजवून खाल्ल्यास होतील हे फायदे, वाचून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल
पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आजपासून आंदोलन
ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून धर्मांध बनवण्याचा पाकिस्तान, दुबईतून प्रयत्न; सुरक्षा यंत्रणेने डाव उधळला
मिंधेंचा रुसवा फुगवा कायम? पोलीस दलाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीसांसह अजित पवारांची हजेरी, शिंदेंची मात्र दांडी
शिंदेचे मंत्री आता त्यांचंही ऐकत नाहीत, फडणवीस त्यांचे बॉस झालेयत; अंबादास दानवे यांचा टोला
जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यात 899 शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल, सर्वाधिक प्रमाण छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात