मामाने भाचीला लोकलमधून फेकले, भाईंदर-नालासोपारा दरम्यानची घटना

मामाने भाचीला लोकलमधून फेकून दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भाईंदर-नालासोपारा दरम्यान घडली आहे. कोमल सोनार असे या 16 वर्षीय दुर्दैवी भाचीचे नाव असून मामा अर्जुन सोनी (20) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने कोमलला लोकलमधून का ढकलून दिले याचा शोध घेण्यात येत असून अर्जुन याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

कोमल ही मानखुर्द येथे राहत होती. मागील दोन दिवसांपूर्वी ती वसई पूर्वच्या वालीव परिसरात वास्तव्यास असलेल्या मामाच्या घरी आली होती. 15 नोव्हेंबर रोजी कोणालाही न सांगता ती घरातून निघून गेली. नातेवाईकांनी शोधाशोध करूनही तिचा थांगपत्ता लागला नाही. मामा अर्जुन सोनी हा भाची कोमल हिला भाईंदरवरून नालासोपारा येथे लोकलने घेऊन निघाला होता. लोकल नायगाव-भाईंदर दरम्यान पोहोचताच अर्जुन याने भाचीला धावत्या लोकलमधून ढकलून दिले. त्यात तिचा मृत्यू झाला.

नेमके कारण काय?
याप्रकरणी सुरुवातीला वसई रेल्वे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर पुढील चौकशीसाठी हे प्रकरण वालीव पोलिसांकडे वर्ग करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगवान डांगे यांनी दिली. मुलगी वालीव पोलिसांच्या हद्दीतून बेपत्ता झाली असल्याने या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला होता. सोमवारी मुलीचा मामा अर्जुन सोनी याला पोलिसांनी अटक केली. लोकलमधून प्रवास करीत असताना मामा व भाची यांच्यात बाचाबाची झाली होती का याचाही शोध पोलीस घेत आहेत. तसेच लोकलमधून ढकलून देण्यामागे नेमके कारण काय हे तपासानंतर उघडकीस येणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी ‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी
बऱ्याचदा आपण चवीच्या हव्यासापोटी अनेकदा जंकफुडचे सेवन करतो. पण या सर्वांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अशातच सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन...
अक्रोड भिजवून खाल्ल्यास होतील हे फायदे, वाचून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल
पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आजपासून आंदोलन
ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून धर्मांध बनवण्याचा पाकिस्तान, दुबईतून प्रयत्न; सुरक्षा यंत्रणेने डाव उधळला
मिंधेंचा रुसवा फुगवा कायम? पोलीस दलाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीसांसह अजित पवारांची हजेरी, शिंदेंची मात्र दांडी
शिंदेचे मंत्री आता त्यांचंही ऐकत नाहीत, फडणवीस त्यांचे बॉस झालेयत; अंबादास दानवे यांचा टोला
जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यात 899 शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल, सर्वाधिक प्रमाण छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात