निवडणूक आयोगाने जनतेच्या भावनांची दखल घेतली नाही, अंबादास दानवे यांची टीका
निवडणूक आयोगाने जनतेच्या भावनांची दखल घेतली नाही, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.
अंबादास दानवे म्हणाले आहेत की, “निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असला तरी, निवडणूक आयोगाने जनतेचा रेटा आणि भावनांची दखल घेतली नाही. दुबार मतदारांबाबत निवडणूक आयोगाने केलेला खुलासा समर्थनीय नाही. नावे स्टार करत असतील तर तुम्हाला दुबार नावे माहीत आहेत ती गाळून टाका मग. यात मतदाराला विचारण्याची गरज नाही, जिथे मतदार राहतो तिथे त्याचे नाव असावे, आणि जिथे नाव नाही ते नाव गाळून टाकले पाहिजे.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List