पात्र मतदार हटवण्यासाठी आखलेला डाव, SIR प्रकरणी द्रमुकची निवडणूक आयोगावर टीका

पात्र मतदार हटवण्यासाठी आखलेला डाव, SIR प्रकरणी द्रमुकची निवडणूक आयोगावर टीका

मंगळवारी द्रविड मुनेत्र कळघमने भारताच्या निवडणूक आयोगावर टीका केली. 1 जुलै 2025 च्या संदर्भात बिहारच्या मतदार यादीचा वापर करून अयोग्य मतदारांची नावे जोडण्यासाठी ‘जाणूनबुजून पावले उचलली’ जात असल्याचा आरोप केला आहे.

द्रमुक नेते एन.आर. इलंगो म्हणाले की हा पात्र मतदारांची नावे वगळण्याचा आणि अयोग्य लोकांची नावे समाविष्ट करण्याचा ठरवून केलेला प्रयत्न आहे. निवडणूक आयोगाच्या कृतीतून हेच स्पष्ट होते. आणि हे ओपन सिक्रेट असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच ही प्रक्रिया दुर्दैवी आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये बिहारमध्ये मतदान केलेल्या एखाद्या व्यक्तीला बिहारचा ‘सामान्य रहिवासी’ मानणे ही गोष्ट सहज स्वीकारण्यासारखी नाही.

गेल्या महिन्यात, निवडणूक आयोगाने बिहार SIR मतदार यादी SIR 2.0 मतदार यादी पुनरावलोकनासाठी दाखवता येणाऱ्या 13व्या वैध दस्तऐवजामध्ये समाविष्ट केला. हे पाऊल उचलताच एम.के. स्टॅलिन यांच्या पक्षाने चिंता व्यक्त केली. यामुळे पात्रता निकष न तपासताच बिहारमधील मतदारांना तामिळनाडूच्या मतदार यादीत समाविष्ट केले जाईल का असा सवाल स्टॅलिन यांनी उपस्थित केला.

यापूर्वीही पक्षाने मतदार यादी पुनरावलोकनाच्या हेतूबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी स्वतः सांगितले की SIR ची अंमलबजावणी केल्यास लाखो वैध मतदारांची नावे मनमानी पद्धतीने हटवली जातील. पक्षाने 47 राजकीय पक्षांसह सर्वपक्षीय बैठक घेऊन SIR च्या अंमलबजावणीविरुद्ध एकत्रितपणे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान, SIR च्या अंमलबजावणीमुळे प्रचंड कामाच्या ताणाखाली तामिळनाडूमध्ये सरकारी कर्मचारीही आंदोलन करत आहेत. एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने सांगितले, “प्रत्येक मतदाराची घरोगरी जाऊन पडताळणी करणे ही सोपी गोष्ट नाही. कामाचा ताण खूप मोठा आहे. मागील दोन आठवड्यांपासून आम्ही रात्री 1 वाजेपर्यंत काम करत आहोत. त्यामुळे आम्ही बहिष्काराचा निर्णय घेतला.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी ‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी
बऱ्याचदा आपण चवीच्या हव्यासापोटी अनेकदा जंकफुडचे सेवन करतो. पण या सर्वांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अशातच सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन...
अक्रोड भिजवून खाल्ल्यास होतील हे फायदे, वाचून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल
पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आजपासून आंदोलन
ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून धर्मांध बनवण्याचा पाकिस्तान, दुबईतून प्रयत्न; सुरक्षा यंत्रणेने डाव उधळला
मिंधेंचा रुसवा फुगवा कायम? पोलीस दलाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीसांसह अजित पवारांची हजेरी, शिंदेंची मात्र दांडी
शिंदेचे मंत्री आता त्यांचंही ऐकत नाहीत, फडणवीस त्यांचे बॉस झालेयत; अंबादास दानवे यांचा टोला
जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यात 899 शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल, सर्वाधिक प्रमाण छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात