नवाब मलिकांना सत्र न्यायालयाचा दणका, मनी लॉण्डरिंग प्रकरणात आरोप निश्चित

नवाब मलिकांना सत्र न्यायालयाचा दणका, मनी लॉण्डरिंग प्रकरणात आरोप निश्चित

अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणात सत्र न्यायालयाने आरोप निश्चित केले असून जानेवारीपासून त्यांच्याविरोधात खटला चालवला जाणार आहे. दरम्यान, आरोप निश्चितीला स्थगिती देण्याची मागणी मलिकांच्या वकिलांनी केली, मात्र पीएमएलए कोर्टाचे अतिरिक्त न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी ती मागणी फेटाळून लावल्याने त्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

ईडीने मनी लॉण्डरिंग तसेच अंडवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर व हस्तकाशी सुमारे 300 कोटींच्या मालमत्तेचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवत मलिकांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मलिक यांनी हसीना पारकर, सलीम पटेल आणि सरदार खानशी संगनमत करून मालमत्ता ताब्यात घेतल्याचा आरोप ईडीने केला असून याप्रकरणी नवाब मलिक व त्यांच्या कुटुंबीयांची भागीदारी असलेल्या मेसर्स मलिक इन्फ्रास्ट्रक्चर, मेसर्स सॉलिडस इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेडने भाडे वसूल केल्याचे म्हटले आहे. मलिकांनी सत्र न्यायालयात दोषमुक्ततेचा अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला. आज मंगळवारी विशेष न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी न्यायालयाने नवाब मलिक यांना आरोप मान्य आहेत का, असे विचारले त्यावर मालिकांनी नकार दर्शवत आरोप फेटाळून लावले. त्यानंतर न्यायाधीशांनी पीएमएलए कायदा कलम 3, कलम 4 आणि कलम 17 अंतर्गत मलिक यांच्या विरोधात आरोप निश्चित केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी ‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी
बऱ्याचदा आपण चवीच्या हव्यासापोटी अनेकदा जंकफुडचे सेवन करतो. पण या सर्वांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अशातच सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन...
अक्रोड भिजवून खाल्ल्यास होतील हे फायदे, वाचून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल
पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आजपासून आंदोलन
ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून धर्मांध बनवण्याचा पाकिस्तान, दुबईतून प्रयत्न; सुरक्षा यंत्रणेने डाव उधळला
मिंधेंचा रुसवा फुगवा कायम? पोलीस दलाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीसांसह अजित पवारांची हजेरी, शिंदेंची मात्र दांडी
शिंदेचे मंत्री आता त्यांचंही ऐकत नाहीत, फडणवीस त्यांचे बॉस झालेयत; अंबादास दानवे यांचा टोला
जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यात 899 शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल, सर्वाधिक प्रमाण छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात