ठाणे, रायगड. पालघरमध्ये 450 नगर परिषद उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप

ठाणे, रायगड. पालघरमध्ये 450 नगर परिषद उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप

ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील १५ नगरपालिका आणि १ नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जाची आज छाननी झाली. २८०० हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील ४५० हून अधिक उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आले. यातील ५५ अर्ज अवैध ठरवण्यात आले. बहुतांश अर्जावर रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती. छाननीतील वैध आणि अवैध अर्जाची अंतिम यादी उद्या बुधवारी जाहीर होणार आहे.

– उरणमध्ये नगरसेवकपदाचे सहा अर्ज अवैध, नगराध्यक्षपदाचे ९ पैकी २ अर्ज अवैध.

– वाड्यात नगराध्यक्षपदाचे ३ अर्ज अवैध, नगरसेवकपदाचे २६ अर्ज अवैध.

– खोपोलीत अजित पवार गटाचे सुनील पाटील आणि शिंदे गटाचे कुलदीपक शेंडे यांच्या अर्जावर आक्षेप.

– निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र ठाकूर यांनी माथेरान नगरपालिकेतील माजी नगरसेवक मनोज खेडकर आणि चंद्रकांत चौधरी यांचे अर्ज अवैध ठरविले. चौधरी यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज मात्र वैध ठरला.

वाड्यात अजित पवार गटाने दिला शिंदे गटाला धक्का

वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीपूर्वीच शिंदे गटाला धक्का बसला आहे. शिंदे गटाकडून नगरपंचायतीतील प्रभाग १२ मध्ये प्रसाद ठाकरे यांना उमेदवारी दिली होती. छाननीदरम्यान अजित पवार गटाचे उमेदवार प्रफुल्ल पाटील हे नगरपंचायतीचे ठेकेदार असल्याने त्यांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात यावे असा आक्षेप घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब अंधारे यांनी दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर शिंदे गटाचे उमेदवार प्रसाद ठाकरे यांचा अर्ज अवैध ठरवला.

पालघरमध्ये ३३ अर्ज बाद

पालघर नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाच्या छाननीदरम्यान नगरसेवकपदाचे ३३ अर्ज बाद ठरले, तर शिंदे गटाचे रवींद्र म्हात्रे, सुभाष पाटील आणि भाजपचे मुनाफ मेमन या तिघांविरोधात वेगवेगळे आक्षेप नोंदवले आहेत. हे तीन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्णयासाठी राखून ठेवले आहेत. नगरसेवकपदासाठी १३६ अर्ज वैध ठरले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी ‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी
बऱ्याचदा आपण चवीच्या हव्यासापोटी अनेकदा जंकफुडचे सेवन करतो. पण या सर्वांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अशातच सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन...
अक्रोड भिजवून खाल्ल्यास होतील हे फायदे, वाचून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल
पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आजपासून आंदोलन
ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून धर्मांध बनवण्याचा पाकिस्तान, दुबईतून प्रयत्न; सुरक्षा यंत्रणेने डाव उधळला
मिंधेंचा रुसवा फुगवा कायम? पोलीस दलाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीसांसह अजित पवारांची हजेरी, शिंदेंची मात्र दांडी
शिंदेचे मंत्री आता त्यांचंही ऐकत नाहीत, फडणवीस त्यांचे बॉस झालेयत; अंबादास दानवे यांचा टोला
जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यात 899 शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल, सर्वाधिक प्रमाण छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात