शिक्षकांच्या बदल्या 30 मेनंतर नकोत, हायकोर्टाचे आदेश; 53 वर्षे पूर्ण झालेल्यांना दुर्गम भागात बदली नाही

शिक्षकांच्या बदल्या 30 मेनंतर नकोत, हायकोर्टाचे आदेश; 53 वर्षे पूर्ण झालेल्यांना दुर्गम भागात बदली नाही

शिक्षकांच्या बदल्या 30 मेनंतर करू नका, असे महत्त्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. प्रशासकीय गरज व अपवादात्मक परिस्थितीतच या मुदतीनंतर बदल्या करता येतील, असेही न्यायालयाने नमूद केले.

मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. नियमानुसार बदली प्रक्रिया जानेवारी महिन्यात सुरू होईल. 30 एप्रिलपर्यंत शिक्षकांना बदली आदेश मिळतील. 30 मेपर्यंत शिक्षक बदली ठिकाणी रुजू होऊ शकतील. या प्रक्रियेत बदल करू नका, असे खंडपीठाने बजावले आहे.

वयाची 53 वर्षे पूर्ण केलेल्या महिला व पुरुष शिक्षकांची दुर्गम भागात बदली करू नका, असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. संच मान्यतेसाठी 2024 मध्ये जारी केलेल्या जीआरवरही न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यानुसार 10 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शिक्षकाची बदली होणार आहे.

पतीपत्नी 30 किमीच्या अंतरात

 पती-पत्नी शिक्षकांची नियुक्ती 30 किमीच्या अंतरात असावी या नियमाचेही काटेकोरपणे पालन करा, असेही न्यायालयाने नमूद केले.

काय आहे प्रकरण 

गेल्या वर्षी राज्य शासनाने संच मान्यता व शिक्षकांच्या बदल्यांविषयी जीआर जारी केला. याविरोधात अॅड. सुरेश पाकळे यांच्या मार्फत शेकडो याचिका दाखल झाल्या. यावर 52 पानी निकाल देत न्यायालयाने या याचिका निकाली काढल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देश- विदेश – 17 फेब्रुवारीला पहिले सूर्यग्रहण देश- विदेश – 17 फेब्रुवारीला पहिले सूर्यग्रहण
2026 मधील पहिले सूर्यग्रहण 16 फेब्रुवारीला मंगळवारी होईल, परंतु हे सूर्यग्रहण हिंदुस्थानात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण एक वर्तुळात म्हणजेच रिंग...
उद्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 6तास बंद राहणार
मिंध्यांच्या मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार; भाजपकडून राजकीय आणि आर्थिक नाकाबंदीमुळे घुसमट – स्फोट करण्याचा इशारा, फडणवीसांनी शिंदेंसमोरच मंत्र्यांना उडवून लावले
परत कुणीतरी गावाला जाणार, आदित्य ठाकरे यांनी डिवचले
पार्थ पवारांचे नावच नाही… क्लीन चिट! मुंढवा जमीन घोटाळ्याचा चौकशी अहवाल आला
शिक्षकांच्या बदल्या 30 मेनंतर नकोत, हायकोर्टाचे आदेश; 53 वर्षे पूर्ण झालेल्यांना दुर्गम भागात बदली नाही
मुंबईत परवडणाऱ्या घरांची घोषणा, निवडणुकीसाठी महायुतीचे गाजर