200 कोटींचे आमिष दाखवून 30 कोटी हडपले, दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि पत्नीविरोधात फसवणुकीचा गुन्हा

200 कोटींचे आमिष दाखवून 30 कोटी हडपले, दिग्दर्शक विक्रम भट्ट आणि पत्नीविरोधात फसवणुकीचा गुन्हा

बायोपिकच्या नावाखाली 200 कोटींचे आमिष दाखवून 30 कोटी रुपये हडपल्याप्रकरणी बॉलीवूड दिग्दर्शक विक्रम भट्ट  आणि त्यांची पत्नी श्वेतांबरी भट्ट  यांच्यासह आठ जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये उदयपूर येथील दिनेश कटारिया याचाही समावेश आहे.

इंदिरा आयव्हीएफ हॉस्पिटलचे मालक डॉ. अजय मुरडिया यांनी उदयपूर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. विक्रम भट्ट आणि त्याच्या साथीदारांनी डॉ. मुरडिया यांच्या पत्नीच्या स्मरणार्थ चित्रपट बनवण्याचे आमिष दाखवले. तसेच चित्रपट प्रदर्शित झाल्यावर 200 कोटी रुपये कमवण्याचे आश्वासनही दिले असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

एफआयआरमधील माहितीनुसार, डॉ. अजय एका कार्यक्रमात ते दिनेश कटारिया यांना भेटले होते, त्यांनी त्यांना त्यांच्या दिवंगत पत्नीच्या स्मरणार्थ बायोपिक बनवण्याचा सल्ला दिला. तसेच विक्रम भट्ट यांच्याशी मुंबईत भेट घालून दिली. डॉ. मुरडिया यांनी 31 मे 2024 रोजी 2.5 कोटी रुपये पाठवले. त्यानंतर त्यांना चार चित्रपटांचे आश्वासन देण्यात आले आणि ते पैसे सतत ट्रान्सफर करत राहिले. एकूण 30 कोटींहून अधिक रकमेचा अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विक्रम भट्ट यांनी त्यांना दुसऱया चित्रपटातही गुंतवणूक करण्यास सांगितले होते. तसेच संपूर्ण रक्कम  परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यांची पत्नी आणि मुलगीदेखील या चित्रपट निर्मितीत असल्याची माहिती दिली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी ‘या’ 4 पदार्थाच्या सेवनाने होऊ शकते पोटदुखी आणि आम्लपित्त, आजच आहारातून पदार्थांचा समावेश करा कमी
बऱ्याचदा आपण चवीच्या हव्यासापोटी अनेकदा जंकफुडचे सेवन करतो. पण या सर्वांचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. अशातच सतत बाहेरच्या पदार्थांचे सेवन...
अक्रोड भिजवून खाल्ल्यास होतील हे फायदे, वाचून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल
पीक विम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकऱ्यांचे आजपासून आंदोलन
ऑनलाइन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून धर्मांध बनवण्याचा पाकिस्तान, दुबईतून प्रयत्न; सुरक्षा यंत्रणेने डाव उधळला
मिंधेंचा रुसवा फुगवा कायम? पोलीस दलाच्या कार्यक्रमास मुख्यमंत्री फडणवीसांसह अजित पवारांची हजेरी, शिंदेंची मात्र दांडी
शिंदेचे मंत्री आता त्यांचंही ऐकत नाहीत, फडणवीस त्यांचे बॉस झालेयत; अंबादास दानवे यांचा टोला
जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान मराठवाड्यात 899 शेतकऱ्यांनी उचलले टोकाचे पाऊल, सर्वाधिक प्रमाण छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात