परत कुणीतरी गावाला जाणार, आदित्य ठाकरे यांनी डिवचले

परत कुणीतरी गावाला जाणार, आदित्य ठाकरे यांनी डिवचले

शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या नाराजीवरून शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचले. आज परत कुणीतरी गावी जाणार, असा टोला लगावत आदित्य ठाकरे यांनी खिल्ली उडवली.

आदित्य ठाकरे यांनी एक्सच्या माध्यमातून निशाणा साधला. आदित्य ठाकरे म्हणाले, असं कळलंय की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. गेलेच नाहीत! का? तर म्हणे राग आलाय! भयंकर राग! मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपवर! निवडणुकीतलं जागावाटप आणि म्हणे ह्यांचा पक्ष फोडताएत म्हणून! ह्याला म्हणतात चोर मचाये शोर!

पण ह्यांच्या स्वार्थापोटी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकणे म्हणजे महाराष्ट्राचा आणि इथल्या जनतेचा अपमान आहे! मंत्रिमंडळ बैठका जनतेचे प्रश्न सोडवायला असतात, तुमचे रुसवेफुगवे सांभाळायला नाहीत! कसा चाललाय हा कारभार? महाराष्ट्रासाठी हे सगळं चिंताजनक आहे, अशा तीव्र भावना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देश- विदेश – 17 फेब्रुवारीला पहिले सूर्यग्रहण देश- विदेश – 17 फेब्रुवारीला पहिले सूर्यग्रहण
2026 मधील पहिले सूर्यग्रहण 16 फेब्रुवारीला मंगळवारी होईल, परंतु हे सूर्यग्रहण हिंदुस्थानात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण एक वर्तुळात म्हणजेच रिंग...
उद्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 6तास बंद राहणार
मिंध्यांच्या मंत्र्यांचा कॅबिनेटवर बहिष्कार; भाजपकडून राजकीय आणि आर्थिक नाकाबंदीमुळे घुसमट – स्फोट करण्याचा इशारा, फडणवीसांनी शिंदेंसमोरच मंत्र्यांना उडवून लावले
परत कुणीतरी गावाला जाणार, आदित्य ठाकरे यांनी डिवचले
पार्थ पवारांचे नावच नाही… क्लीन चिट! मुंढवा जमीन घोटाळ्याचा चौकशी अहवाल आला
शिक्षकांच्या बदल्या 30 मेनंतर नकोत, हायकोर्टाचे आदेश; 53 वर्षे पूर्ण झालेल्यांना दुर्गम भागात बदली नाही
मुंबईत परवडणाऱ्या घरांची घोषणा, निवडणुकीसाठी महायुतीचे गाजर