दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी प्रवासी संघटना आक्रमक, 2 ऑक्टोबरला दादर स्थानकात लाक्षणिक उपोषण

दादर-रत्नागिरी पॅसेंजरसाठी प्रवासी संघटना आक्रमक, 2 ऑक्टोबरला दादर स्थानकात लाक्षणिक उपोषण

कोरोना महामारीपासून बंद केलेली दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन पुन्हा सुरू करावी, या मागणीसाठी प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने तातडीने ही गाडी पूर्ववत सुरू करावी, अन्यथा 2 ऑक्टोबरला मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात लाक्षणिक उपोषण करू, असा इशारा प्रवाशांतर्फे जल फाऊंडेशनचे नितीन जाधव आणि रेल्वे प्रवासी कार्यकर्ते अक्षय महापदी यांनी दिला आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील वाढती प्रवासी संख्या विचारात घेऊन नवीन मुंबई-चिपळूण रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनेने केली आहे. मध्य रेल्वेने मुंबई-चिपळूणदरम्यान द्वितीय श्रेणी आरक्षित, एसी चेअर कार व सामान्य अनारक्षित डबे असणारी तसेच दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे आदी स्थानकांवर थांबणारी नियमित गाडी सुरू करावी, अशी मागणी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सांगलीतील 9 हजारांवर शिक्षकांना धक्का, कागदपत्रांच्या पडताळणीनंतर आता ‘टीईटी’ची सक्ती; 52 वर्षांच्या आतील गुरुजींना द्यावी लागणार परीक्षा सांगलीतील 9 हजारांवर शिक्षकांना धक्का, कागदपत्रांच्या पडताळणीनंतर आता ‘टीईटी’ची सक्ती; 52 वर्षांच्या आतील गुरुजींना द्यावी लागणार परीक्षा
दोन महिन्यांपूर्वी नागपूरमध्ये ‘शालार्थ आयडी’ घोटाळा उघडकीस आल्यानंतर राज्यातील शिक्षकांच्या नियुक्तीची पडताळणी सुरू करण्यात आली होती. शिक्षकांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण...
कोल्हापूर महापालिका प्रभागरचनेवर 55 हरकती, 22 सप्टेंबरपर्यंत होणार सुनावणी
रसायनयुक्त बनावट देशी दारू बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, कराड शहर पोलिसांची कारवाई; 11 लाखांच्या मुद्देमालासह तिघांना अटक
पंढरपूर तीर्थक्षेत्र आहे, कॉरिडॉर करून पर्यटनस्थळ बनवू नका; ऍड. जगदीश शेट्टी यांची मागणी
शक्तीपीठ महामार्ग अनावश्यक, राज्याला कर्जाच्या खाईत लोटणारा; न्यायालयात जाणार! – राजू शेट्टी
सोलापुरात आरक्षणासाठी बंजारा समाजाचा मोर्चा
सात जोडपी घटस्फोटाच्या उंबरठ्यावरून मागे फिरली, लोकअदालतीची यशस्वी शिष्टाई