इस्रायलचा गाझावर हल्ला, ४१ जणांचा मृत्यू, ३ लाख लोकांनी शहर सोडले

इस्रायलचा गाझावर हल्ला, ४१ जणांचा मृत्यू, ३ लाख लोकांनी शहर सोडले

इस्रायली सैन्याने गाझा शहरात जमीनी हल्ले सुरू केले असून, या कारवाईत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. सीएनएनने दोन इस्रायली अधिकाऱ्यांच्या हवाल्याने मंगळवारी सकाळी याबाबत वृत्त दिले. इस्रायली लष्कराच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे ३.२ लाख लोकांनी शहर सोडले आहे.

इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ म्हणाले की, ओलिसांच्या सुटकेसाठी आणि हमासच्या पराभवासाठी सैन्य धैर्याने लढत आहे. काट्झ म्हणाले की, गाझा जळत आहे, सैन्य दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर पूर्ण ताकदीने हल्ला करत आहे. ध्येय पूर्ण होईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आणि थांबणारही नाही.

दरम्यान, इस्रायलने गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये गाझा शहर ताब्यात घेण्याच्या योजनेला मान्यता दिली. याअंतर्गत, सुमारे ६० हजार राखीव सैनिकांना ड्युटीवर बोलावण्याचा आदेश देण्यात आले. याच मोहिमेची सुरुवात करत इस्रायलने गाझावर हल्ले सुरु केले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फेसबुकवरील मैत्रीचं प्रेमात रुपांतर, मग भेटीगाठी अन् प्रेमकहाणीचा भयानक अंत; प्रकरण काय? फेसबुकवरील मैत्रीचं प्रेमात रुपांतर, मग भेटीगाठी अन् प्रेमकहाणीचा भयानक अंत; प्रकरण काय?
फेसबुकवरील मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. मग भेटीगाठी होत गेल्या आणि प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्याने एका प्रेमकहाणीचा भयानंक अंत झाला आहे....
मोनोरेलची सेवा पुढील आदेशापर्यंत स्थगित, वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडानंतर एमएमआरडीएचा निर्णय
इस्रायलचा गाझावर हल्ला, ४१ जणांचा मृत्यू, ३ लाख लोकांनी शहर सोडले
Beed News – लाखो ठेवीदारांच्या अब्जावधी रुपयांवर डल्ला मारणार्‍या फरार अर्चना कुटे पुण्यात जेरबंद
डोपिंग टेस्ट प्रकरणी ICC ची मोठी कारवाई, नेदरलॅंडच्या खेळाडूवर तीन महिन्यांची बंदी
निगरगट्ट सत्ताधार्‍यांना शेतकर्‍यांच्या अश्रूची किंमत नाही, जिल्हाप्रमुख उल्हास गिराम उदिग्न
शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा, कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करणार – राजू शेट्टी