निगरगट्ट सत्ताधार्‍यांना शेतकर्‍यांच्या अश्रूची किंमत नाही, जिल्हाप्रमुख उल्हास गिराम उदिग्न

निगरगट्ट सत्ताधार्‍यांना शेतकर्‍यांच्या अश्रूची किंमत नाही, जिल्हाप्रमुख उल्हास गिराम उदिग्न

बीड जिल्ह्यात वर्ष भरात तब्बल एक हजार  शेतकर्‍यांच्या आत्महत्या झाल्या आहेत, एक हजार शेतकर्‍याची कुटंब उद्ध्वस्त झाली आहेत. शेकडो कुटुंब कसे बसे तग धरून आहेत, चार दिवसाच्या पावसाने शेतकर्‍यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे, शेतकरी कंगाल झाला आहे, त्याला आधार देणे गरजेचे आहे. मात्र निगरगट्ट सत्ताधार्‍यांना शेतकर्‍यांच्या अश्रूची किंमत नाही. तातडीने नुकसान भरपाई देणे गरजेचे असल्याचे म्हणत आपल्या भावना व्यक्त करताना शिवसेना जिल्हाप्रमुख उल्हास गिराम उदिग्न झाले.

बीड जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसात अतिवृष्टीने अक्षरश: शेतकर्‍यांना उद्धवस्त केले आहे. तब्बल तीन लाख हेक्टरवरील खरीप हंगाम पाण्यावर तरंगत आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. आलेल्या पुरात शेती वाहून गेली आहे. चिंतातूर शेतकरी निसर्गाच्या कोपापुढे हतबल झाला आहे. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळत आहेत. गेल्या वर्षभरात बीड जिल्ह्यामध्ये तब्बल एक हजार शेतकर्‍यांनी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्या आहेत. त्यापेक्षाही भयंकर आणि विदारक परिस्थिती सध्या उद्भवली आहे. खरीप हंगाम उद्धवस्त झाल्याने भविष्य अंधारमय झाले असल्याने शेतकर्‍यांच्या आत्महत्येत मोठी वाढ होते की काय अशी भीती आता वाटू लागली आहे. अशा गंभीर आणि भयंकर परिस्थितीत शेतकर्‍यांना आधार देण्याचे काम सरकारने केले पाहिजे. सत्ताधारी शेतकर्‍यांना आधार देण्याऐवजी गटागटात, जाती जातीत, धर्मा धर्मात वाद निर्माण करून आपली पोळी भाजून घेत आहेत. अत्यंत गंभीर परिस्थिती बीड जिल्ह्यामध्ये उद्भवली आहे. सत्ताधार्‍यांनी शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी तातडीने मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे. पिकविमा कंपनी घोळत ठेवण्याचे काम करत आहे तर सरकार शेतकर्‍यांची दिशाभूल करत आहेत. शेतकर्‍यांच्या अश्रूची किंमत या निगरगठ्ठ सत्ताधार्‍यांना नक्कीच नाही अशा उदिग्न भावना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उल्हास गिराम यांनी व्यक्तकेल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फेसबुकवरील मैत्रीचं प्रेमात रुपांतर, मग भेटीगाठी अन् प्रेमकहाणीचा भयानक अंत; प्रकरण काय? फेसबुकवरील मैत्रीचं प्रेमात रुपांतर, मग भेटीगाठी अन् प्रेमकहाणीचा भयानक अंत; प्रकरण काय?
फेसबुकवरील मैत्रीचं प्रेमात रुपांतर झालं. मग भेटीगाठी होत गेल्या आणि प्रेयसीने लग्नाचा तगादा लावल्याने एका प्रेमकहाणीचा भयानंक अंत झाला आहे....
मोनोरेलची सेवा पुढील आदेशापर्यंत स्थगित, वारंवार होणाऱ्या तांत्रिक बिघाडानंतर एमएमआरडीएचा निर्णय
इस्रायलचा गाझावर हल्ला, ४१ जणांचा मृत्यू, ३ लाख लोकांनी शहर सोडले
Beed News – लाखो ठेवीदारांच्या अब्जावधी रुपयांवर डल्ला मारणार्‍या फरार अर्चना कुटे पुण्यात जेरबंद
डोपिंग टेस्ट प्रकरणी ICC ची मोठी कारवाई, नेदरलॅंडच्या खेळाडूवर तीन महिन्यांची बंदी
निगरगट्ट सत्ताधार्‍यांना शेतकर्‍यांच्या अश्रूची किंमत नाही, जिल्हाप्रमुख उल्हास गिराम उदिग्न
शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा, कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करणार – राजू शेट्टी