एक महिन्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही – सुप्रिया सुळे

एक महिन्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही – सुप्रिया सुळे

एक महिन्यात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारला दिला आहे. नाशिकमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नासांठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत.

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “आज नाशिकला आपण सगळे सरसकट कर्जमाफी मागण्यासाठी आलो आहोत. ही एका मोठ्या संघर्षाची सुरुवात आहे. मी महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना आवाहन करते की, या मोर्चानंतर आपण विनम्रपणे आपआपल्या जिह्यात जा आणि तुमच्या कलेक्टरला भेटा. त्यांना विनंती करा की, तुम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगा की, तुम्ही सरसकट कर्जमाफीचा शब्द दिला होता. ओला दुष्काळ जाहीर करा व सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी करा. जर एक महिन्याच्या आत आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही, तर या सरकारला आम्ही कुठेही फिरु देणार नाही.”

त्या पुढे म्हणाल्या की, “एकतर आमच्या लाडक्या बहिणींना निधी दिला. दिला तर दिला त्यात पहिल्या टप्प्यात पंचवीस लाख महिलांची नावे कमी केली, हे आम्ही सहन करणार नाही. याविरोधात मोठं जनआंदोलन करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. गावा गावात-वस्त्यांवर जाऊ ज्या महिलांचे पैसे बंद केले आहेत, तिच्याशी संघर्ष करु व पैसे मिळवून देऊ.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ डाळीचे करा सेवन, शरीराला मिळतील अनेक फायदे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ डाळीचे करा सेवन, शरीराला मिळतील अनेक फायदे
आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांच्या बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांची कमतरता भासू लागली आहे. ज्यात जास्‍त...
सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन
Ratnagiri News – अर्बन बॅंक संशयाच्या भोवऱ्यात, राजापूर शाखेतून 100 कोटींच्या ठेवी काढल्या
भरधाव ट्रकने 10 ते 15 जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू; अनेक वाहनांना धडक
मुंबई विमानतळावर 49 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, परकीय चलन आणि वन्यजीव हस्तगत
बीड जिल्ह्यात पावसाचा कहर, तीन लाख हेक्टर खरीप पाण्यात; २०० गावांची वाहतूक ठप्प
Chandrapur News – जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांची शासकीय विश्रामगृहात दारू पार्टी, प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ