Ratnagiri News – अर्बन बॅंक संशयाच्या भोवऱ्यात, राजापूर शाखेतून 100 कोटींच्या ठेवी काढल्या

Ratnagiri News – अर्बन बॅंक संशयाच्या भोवऱ्यात, राजापूर शाखेतून 100 कोटींच्या ठेवी काढल्या

राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला पहिल्या लेखापरिक्षणात ‘ड’ वर्ग मिळाला होता. तसेच रत्नागिरी शाखेत अनेकांनी आपण कर्ज घेतलेले नसताना नोटीसा आल्याचा आरोप केल्यानंतर मोठा गोंधळ उडाला. याचा फटका राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेची मुख्य शाखा असलेल्या राजापूरला बसला. राजापूर शाखेतून सुमारे 100 कोटी रूपये पर्यंतच्या ठेवी काढून घेतल्याची माहिती पुढे येत आहे.

राजापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेने यंदाच्या आर्थिक वर्षातील लेखापरिक्षणात मे.संजय मालपाणी अ‍ॅण्ड असोसिएटस यांनी बॅंकेला ‘ड’ वर्ग दिला. 104 वर्षांचा इतिहास असणारी ही बॅंक ‘ड’ वर्गात गेल्याने खळबळ उडाली. बॅंकेत ठेवी असलेल्या संस्थाना धक्का बसला. त्यापाठोपाठ रत्नागिरी शाखेत गोंधळ उडाला. कर्ज न घेता आम्हाला नोटीसा आल्याचा आरोप अनेकांनी केला. काही मंडळींनी आम्ही जामीन नसताना आम्हाला जामीन असल्याच्या नोटीसा आल्या. सहाय्यक निबंधकांसमोरील सुनावणी दरम्यान गदारोळ झाला होता.

दरम्यानच्या काळात कर्ज प्रकरणात अनियमितता झाल्याचा ठपका ठेऊन रत्नागिरी शाखेच्या व्यवस्थापकाला बॅंकने काढून टाकले. यासर्व घटनांचा परिणाम होऊन राजापूर शाखेतील सुमारे 100 कोटी रुपयांच्या ठेवी सभासदांनी भीतीपोटी काढून घेतल्याची माहिती पुढे येत आहे. राजापूर अर्बन बँकने ड वर्गाबाबत दाद मागितल्यानंतर सहकार आयुक्त व सहकार निबंधक पुण्याच्या दीपक तावरे यांनी राजापूर बॅंकेला ब वर्ग दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ डाळीचे करा सेवन, शरीराला मिळतील अनेक फायदे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ डाळीचे करा सेवन, शरीराला मिळतील अनेक फायदे
आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांच्या बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांची कमतरता भासू लागली आहे. ज्यात जास्‍त...
सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन
Ratnagiri News – अर्बन बॅंक संशयाच्या भोवऱ्यात, राजापूर शाखेतून 100 कोटींच्या ठेवी काढल्या
भरधाव ट्रकने 10 ते 15 जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू; अनेक वाहनांना धडक
मुंबई विमानतळावर 49 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, परकीय चलन आणि वन्यजीव हस्तगत
बीड जिल्ह्यात पावसाचा कहर, तीन लाख हेक्टर खरीप पाण्यात; २०० गावांची वाहतूक ठप्प
Chandrapur News – जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांची शासकीय विश्रामगृहात दारू पार्टी, प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ