एल्फिन्स्टन ब्रीज बंद झाल्याने वाहतुकीची कोंडी, वाहतूक खोळंबा रोखण्यासाठी अधिक प्रमाणात पोलीस तैनात करा; आदित्य ठाकरे यांची मागणी

एल्फिन्स्टन ब्रीज बंद झाल्याने वाहतुकीची कोंडी, वाहतूक खोळंबा रोखण्यासाठी अधिक प्रमाणात पोलीस तैनात करा; आदित्य ठाकरे यांची मागणी

एल्फिन्स्टन पूल बंद केल्यामुळे होणारा संभाव्य वाहतूक खोळंबा रोखण्यासाठी अधिक प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना लिहिलेल्या पत्रात आदित्य ठाकरे म्हणाले आहेत की, “एमएमआरडीएने एल्फिन्स्टन फ्लायओव्हर बंद केला असून, यामुळे मोठ्या प्रमाणात आजू बाजू परिसरात मोठी वाहतूक कोंडी होणार आहे. त्यातच सायन पूल आणि लोकमान्य टिळक पूलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने अधिक गैरसोय होऊ शकते.”

त्यांनी पत्रात पुढे लिहिलं आहे की, “आधीच मुंबई पोलीसांवर प्रचंड ताण आहे, याची मला कल्पना असताना, मी आपणास विनंती करतो की, आपण महत्त्वाच्या पूर्व-पश्चिम जोडमार्गावर तसेच विशेषतः माहिम, दादर, वरळी, शिवडी परिसरात अधिक प्रमाणात वाहतूक पोलीस तैनात करावेत. अन्यथा, एमएमआरडीए व महानगरपालिका यांच्यातील नियोजन आणि समन्वयाच्या अभावामुळे मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी परिस्थिती अतिशय गंभीर होईल.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ डाळीचे करा सेवन, शरीराला मिळतील अनेक फायदे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ डाळीचे करा सेवन, शरीराला मिळतील अनेक फायदे
आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांच्या बदलत्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वांची कमतरता भासू लागली आहे. ज्यात जास्‍त...
सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन
Ratnagiri News – अर्बन बॅंक संशयाच्या भोवऱ्यात, राजापूर शाखेतून 100 कोटींच्या ठेवी काढल्या
भरधाव ट्रकने 10 ते 15 जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू; अनेक वाहनांना धडक
मुंबई विमानतळावर 49 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, परकीय चलन आणि वन्यजीव हस्तगत
बीड जिल्ह्यात पावसाचा कहर, तीन लाख हेक्टर खरीप पाण्यात; २०० गावांची वाहतूक ठप्प
Chandrapur News – जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांची शासकीय विश्रामगृहात दारू पार्टी, प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ