अस्थी विसर्जन करून परतत असताना काळाचा घाला, कार अपघातात दोन चिमुकल्यांसह 7 जणांचा मृत्यू

अस्थी विसर्जन करून परतत असताना काळाचा घाला, कार अपघातात दोन चिमुकल्यांसह 7 जणांचा मृत्यू

नातेवाईकांच्या अस्थी विसर्जन करून घरी परतत असताना वाटेतच काळाने घाला घातला. कार अनियंत्रित होऊन उलटल्याने अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ दाखल होत सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. मृतांमध्ये तीन पुरुष, दोन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.

जयपूरमधील वाटिका रिंग रोडवर रविवारी हा अपघात झाला. कारमध्ये दोन लहान मुलांसह सात जण होते. सर्वजण हरिद्वार येथे नातेवाईकाच्या अस्थीविसर्जन करण्यासाठी गेले होते. तेथून घरी परतत असतानाच वाटिका रिंग रोडजवळ कार अनियंत्रित झाली आणि उलटली. या अपघातात कारमधील सातही जणांचा मृत्यू झाला.

स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी रुग्णालयात पाठवले. पोलीस पुढील तपास करत आहेत. रामराज वैष्णव, मधु, रुद्र, कालूराम, सीमा, रोहित आणि गजराज अशी मयतांची नावे आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती  आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती 
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयातील मुलांना देखील केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. यामुळे फक्त अनुवांशिक कारण...
वेळ न सांगता येऊन बघा, खरी परिस्थिती कळेल; अजित पवारांना पुणेकर महिलेने सुनावले
Pune: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ईएमआय थकवला तर मोबाईल लॉक होणार, हप्त्यावर फोन घेणाऱ्यांसाठी नवा नियम
रनवेवरून धावणाऱ्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक, लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
‘दशावतार’ने गारुड घातलं; प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद, दोन दिवसांत दोन कोटीची झेप
वेळेआधी आला..अन् वेळेआधी निघालासुद्धा; परतीच्या पावसाचा महाराष्ट्राला दणका