मोदींमध्ये जरा तरी भावभावना आहेत का? Ind Pak सामन्यावरून भाजप नेत्याचा संतप्त सवाल

मोदींमध्ये जरा तरी भावभावना आहेत का? Ind Pak सामन्यावरून भाजप नेत्याचा संतप्त सवाल

आशिया कपमध्ये आज हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला देशभरातून विरोध होत असताना बीसीसीआय व केंद्र सरकार हा सामना खेळवण्यावर अडून बसले आहेत. त्यावरून भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी देखील केंद्र सरकारला घरचा आहेर दिला आहे. या सामन्यावरून बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये जरा तरी भाव भावना आहेत का? असा संतप्त सवाल केला आहे.

”देशातील 26 विवाहित महिलांच्या डोळ्यासमोर त्यांच्या पतींची पाकिस्तानी दहशतवाद्यांनी क्रूरपणे हत्या केली!! पण त्याहूनही भयानक म्हणजे या सर्वाच्या पुढे जाऊन आपण पाकिस्तानच्या कसायांसोबत क्रिकेट खेळणे! मोदी भारत आणि पाकिस्तानला क्रिकेट खेळण्याची परवानगी देतात, त्यांच्यात थोडीशीही भावभावनना आहे का?”, असा सवाल स्वामी यांनी केला आहे.

संबंध सुधारेपर्यंत पाकशी क्रिकेट-व्यापार नको! – हरभजन सिंग

माजी फिरकीवीर हरभजन सिंगने येत्या 14 सप्टेंबरला दुबईत होणाऱ्या हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यापूर्वी थेट भूमिका घेतली आहे. भज्जीने स्पष्ट शब्दांत सांगितले, दोन्ही देशांतील संबंध सुधारले नाहीत तोवर क्रिकेट आणि व्यापारही नको. पण हे त्याचे वैयक्तिक मत असल्याचे त्याने स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती  आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती 
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयातील मुलांना देखील केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. यामुळे फक्त अनुवांशिक कारण...
वेळ न सांगता येऊन बघा, खरी परिस्थिती कळेल; अजित पवारांना पुणेकर महिलेने सुनावले
Pune: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ईएमआय थकवला तर मोबाईल लॉक होणार, हप्त्यावर फोन घेणाऱ्यांसाठी नवा नियम
रनवेवरून धावणाऱ्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक, लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
‘दशावतार’ने गारुड घातलं; प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद, दोन दिवसांत दोन कोटीची झेप
वेळेआधी आला..अन् वेळेआधी निघालासुद्धा; परतीच्या पावसाचा महाराष्ट्राला दणका