बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार! 32 गावांना पुराचा वेढा; गोदावरी, सिंदफणा, सरस्वती, मांजरा, कुंडलिका, बिंदुसरा नद्यांना महापूर

बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार! 32 गावांना पुराचा वेढा; गोदावरी, सिंदफणा, सरस्वती, मांजरा, कुंडलिका, बिंदुसरा नद्यांना महापूर

आठ ते दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने मारलेल्या जोरदार मुसंडीने बीड जिल्ह्यामध्ये हाहाकार उडाला आहे. बीड जिल्ह्यातील १८ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. अनेक नद्यांना महापूर आला आहे. गेवराई आणि माजलगाव तालुक्यातील ३२ गावांना पुराचा फटका बसला आहे. राक्षसभुवने शनि मंदिर, पांचाळेश्वर, गंगामसल्याचे मोरेश्वर पाण्याखाली आहेत. माजलगाव धरणाचे १०, अप्पर कुंडलिका प्रकल्पाचे २, मांजरा प्रकल्पाचे ४ दरवाजे सताड उघडण्यात आले आहेत. प्रशासनाने जिल्हावासियांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

बीड जिल्ह्यात गेल्या चोवीस तासामध्ये पावसाने ४६.१ मि.मी.ची नोंद केली आहे. १८ महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. यंदाच्या पर्जन्यमानाची सरासरी ९५.२ पर्यंत पोहचली आहे. जायकवाडी प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी पात्र भरून वाहत असताना बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे गोदावरी, मांजरा, सिंदफणा, सरस्वती, बिंदुसरा, कुंडलिका, वांजरा या नद्यांना पूर आला आहे. माजलगाव मध्यम प्रकल्पाचे १० वक्री दरवाजातून ०.८० मिटरने ३१ हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मांजरा प्रकल्पाचे पाचव्यांदा दार उघडण्यात आले आहे. ४ दरवाजातून ४ हजार क्युसेसचा विसर्ग सुरू आहे. अप्पर कुंडलिका प्रकल्पाचे २ दरवाजे २० सें.मी.ने उघडण्यात आले आहेत. बीड जिल्ह्यातील तब्बल १०० लघू आणि मध्यम प्रकल्प भरलेले आहेत. अनेक प्रकल्पातून पाणी ओसंडून वाहत आहे. बीड जिल्हा पाणीमय झालेला आहे. गोदावरीला आलेल्या महापुरामुळे गेवराई तालुक्यातील १२ आणि माजलगाव तालुक्यातील २० गावांना पुराचा फटका बसला आहे. राक्षसभुवनचे शनि मंदिर पाण्याखाली आहे. पांचाळेश्वर मंदिरही पाण्यामध्ये बुडाले आहे. गेवराई तालुक्यातील राजापूरला पावसाने वेढा दिला आहे. माजलगाव तालुक्यातही पूर परिस्थिती विदारक आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठच्या शेतामध्ये आणि गावामध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे.अमृत नदी तुडंब भरून वाहत असल्याने गोदावरी पट्ट्यातील दहा ते बारा गावांचा संपर्क तुटला आहे. सरस्वती नदीच्या पाण्यामुळे कोथळा गावात पणी शिरले. माजलगाव तालुक्यातील गव्हाणथडी गावाला पाण्याचा वेढा बसला आहे.

जिल्ह्यातील या १८ महसूल मंडळात झालेली अतिवृष्टी
बीड तालुका- राजुरी ७७.३ मि.मी., नाळवंडी ७४.३ मि.मी., चर्‍हाटा ७७.३ मि.मी., पारगाव सिरस ७७.३ मि.मी.,
पाटोदा तालुका – पाटोदा ६७.८ मि.मी., थेरला ८६.८ मि.मी.
गेवराई तालुका- धोंडराई १९८ मि.मी., उमापूर १३९ मि.मी., रेवकी १४३ मि.मी., तलवाडा ९४ मि.मी., गेवराई ८८ मि.मी., चकलांबा १३१.८ मि.मी.,
परळी तालुका- पिंपळगाव ८०.८ मि.मी.
शिरूरकासार- शिरूर ९१.५, रायमोहा १२१.८ मि.मी., ब्रम्हनाथ येळंब १०९ मि.मी., तिंतरवणी १००.८ मि.मी., खालापुरी ९६.५ मि.मी.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती  आयुष्यातील जास्त तणाव ठरतोय केसगळतीचे मुख्य कारण, जाणून घ्या महत्वाची माहिती 
आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये अगदी कमी वयातील मुलांना देखील केस गळतीची आणि केस पांढरे होण्याची समस्या जाणवते. यामुळे फक्त अनुवांशिक कारण...
वेळ न सांगता येऊन बघा, खरी परिस्थिती कळेल; अजित पवारांना पुणेकर महिलेने सुनावले
Pune: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ईएमआय थकवला तर मोबाईल लॉक होणार, हप्त्यावर फोन घेणाऱ्यांसाठी नवा नियम
रनवेवरून धावणाऱ्या विमानाला इमर्जन्सी ब्रेक, लखनौ विमानतळावर मोठी दुर्घटना टळली
‘दशावतार’ने गारुड घातलं; प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद, दोन दिवसांत दोन कोटीची झेप
वेळेआधी आला..अन् वेळेआधी निघालासुद्धा; परतीच्या पावसाचा महाराष्ट्राला दणका