राष्ट्रीय स्तरावरील भरती परीक्षा प्रक्रियेत गंभीर त्रुटी; सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार, कर्मचारी निवड आयोगाला नोटीस

राष्ट्रीय स्तरावरील भरती परीक्षा प्रक्रियेत गंभीर त्रुटी; सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार, कर्मचारी निवड आयोगाला नोटीस

राष्ट्रीय स्तरावरील भरती परीक्षा घेण्याच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी असून प्रक्रियेत सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी गंभीर दखल घेतली. याचवेळी केंद्र सरकार आणि कर्मचारी निवड आयोगाला याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्या अनुषंगाने केंद्र सरकार व इतर सर्व प्रतिवादींना नोटीसा बजावल्या. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांच्या खंडपीठापुढे ही महत्वपूर्ण सुनावणी झाली.

भरती परीक्षा घेण्याच्या प्रक्रियेत काळानुरुप सुधारणा करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत भरती प्रक्रिया निष्पक्ष पद्धतीने घेतली जात नसून त्याचा हजारो उमेदवारांना फटका बसत आहे, असा दावा करीत निखिल कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

विविध मंत्रालयांमधील अनेक राजपत्रित, अराजपत्रित पदांसाठी भरती परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी कर्मचारी निवड आयोगावर आहे. या उद्देशाने आयोगाने गेल्या अनेक वर्षांपासून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसना निविदा जारी केल्या होत्या. टाटा कन्सल्टन्सी सुरळीत आणि पारदर्शकपणे परीक्षा घेत होती. तथापि, गैरव्यवस्थापनाचे आरोप असलेल्या ‘एज्युक्विटी’च्या निराशाजनक कामगिरीची पूर्ण जाणीव असूनही कर्मचारी निवड आयोगाने अचानक त्यांच्या परीक्षांच्या संगणक-आधारित चाचणी टप्प्यासाठी ‘एज्युक्विटी’ची निवड केली. ‘एज्युक्विटी’ने घेतलेल्या परीक्षा प्रक्रियेत गंभीर त्रुटी होत्या. त्याचा देशभरातील हजारो उमेदवारांना फटका बसला आहे, असे रिट याचिकेत म्हटले आहे.

याचिकेतील दाव्यांची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती नरसिंहा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्र सरकार आणि कर्मचारी निवड आयोगाला नोटीस बजावली. तसेच याचिकेवर लेखी उत्तर सादर करुन भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;