राष्ट्रीय स्तरावरील भरती परीक्षा प्रक्रियेत गंभीर त्रुटी; सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार, कर्मचारी निवड आयोगाला नोटीस

राष्ट्रीय स्तरावरील भरती परीक्षा प्रक्रियेत गंभीर त्रुटी; सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार, कर्मचारी निवड आयोगाला नोटीस

राष्ट्रीय स्तरावरील भरती परीक्षा घेण्याच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटी असून प्रक्रियेत सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी गंभीर दखल घेतली. याचवेळी केंद्र सरकार आणि कर्मचारी निवड आयोगाला याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. त्या अनुषंगाने केंद्र सरकार व इतर सर्व प्रतिवादींना नोटीसा बजावल्या. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांच्या खंडपीठापुढे ही महत्वपूर्ण सुनावणी झाली.

भरती परीक्षा घेण्याच्या प्रक्रियेत काळानुरुप सुधारणा करण्याची गरज आहे. सद्यस्थितीत भरती प्रक्रिया निष्पक्ष पद्धतीने घेतली जात नसून त्याचा हजारो उमेदवारांना फटका बसत आहे, असा दावा करीत निखिल कुमार यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

विविध मंत्रालयांमधील अनेक राजपत्रित, अराजपत्रित पदांसाठी भरती परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी कर्मचारी निवड आयोगावर आहे. या उद्देशाने आयोगाने गेल्या अनेक वर्षांपासून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसना निविदा जारी केल्या होत्या. टाटा कन्सल्टन्सी सुरळीत आणि पारदर्शकपणे परीक्षा घेत होती. तथापि, गैरव्यवस्थापनाचे आरोप असलेल्या ‘एज्युक्विटी’च्या निराशाजनक कामगिरीची पूर्ण जाणीव असूनही कर्मचारी निवड आयोगाने अचानक त्यांच्या परीक्षांच्या संगणक-आधारित चाचणी टप्प्यासाठी ‘एज्युक्विटी’ची निवड केली. ‘एज्युक्विटी’ने घेतलेल्या परीक्षा प्रक्रियेत गंभीर त्रुटी होत्या. त्याचा देशभरातील हजारो उमेदवारांना फटका बसला आहे, असे रिट याचिकेत म्हटले आहे.

याचिकेतील दाव्यांची गंभीर दखल घेत न्यायमूर्ती नरसिंहा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने केंद्र सरकार आणि कर्मचारी निवड आयोगाला नोटीस बजावली. तसेच याचिकेवर लेखी उत्तर सादर करुन भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुम्हालाही अपचनाचा त्रास होतो? मग दररोज करा हे एक आसन आणि चमत्कार  तुम्हालाही अपचनाचा त्रास होतो? मग दररोज करा हे एक आसन आणि चमत्कार 
वज्रासन अत्यंत फायदेशीर ठरते. विशेष म्हणजे दररोज वज्रासन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. अपचन किंवा बद्धकोष्ठतेसारखी समस्या...
लज्जास्पद! वडिलांच्या वयाच्या व्यक्तीकडून बसमध्ये तरुणीच्या विनयभंगाचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल
मुंबईत गणेश विसर्जनादरम्यान सहा जणांना विजेचा धक्का, एकाचा मृत्यू
Bomb Blast in Cricket Match – पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यान बॉम्बस्फोट, एकाचा मृत्यू तर अनेक जण जखमी
उत्तरकाशीमध्ये पुन्हा एकदा अतिवृष्टीचे थैमान; निवासी भागात पाणी शिरले, बचावकार्याला वेग
काय सांगता,पाणी पिण्यामुळे देखील मृत्यू होऊ शकतो? पाण्याचीही होते विषबाधा, तुम्हीही करताय का तीच चूक
Thane News – शहापूरमध्ये घडली दुर्दैवी घटना, विसर्जनावेळी 5 तरुण बुडाले; एकाचा मृत्यू, दोघे बेपत्ता तर दोघांना वाचवण्यात यश