अफगाणिस्तानातील भूकंपातील मृतांची संख्या 1400 वर पोहोचली, तालिबानने जगभरातून मागितली मदत

अफगाणिस्तानातील भूकंपातील मृतांची संख्या 1400 वर पोहोचली, तालिबानने जगभरातून मागितली मदत

अफगानिस्तानच्या नंगरहर प्रांतातील जलालाबादजवळील भागात रविवारी रात्री ११:४७ वाजता ६.० तीव्रतेचा भूकंप झाला. या भूकंपाने जवळपास २ लाख लोकसंख्येच्या भागाला येथे धक्का बसला असून, कुणार प्रांतात सर्वाधिक जीवितहानी झाली आहे. सोमवारी कुणारमध्ये आणखी ४.६ तीव्रतेचा भूकंप झाला, ज्याने परिस्थिती आणखी बिकट केली आहे.

तालिबान सरकारने जगभरातील देशांकडून मदत मागितली असून, हिंदुस्थान, चीन आणि ब्रिटनसह संयुक्त राष्ट्रांनी मदतीची घोषणा केली आहे. भूंकपातील मृतांची संख्या १४११ पर्यंत पोहोचली असून, जखमींची संख्या ३२५० च्या पुढे गेली आहे. मृतांची संख्या आणखी वाढू शकते, असे बोलले जात आहे.

भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू जलालाबादपासून १७ मैल अंतरावर नंगरहर प्रांतात आहे. हा डोंगराळ भाग असल्याने आणि भूकंपासाठी रेड झोन म्हणून ओळखला जाणारा भाग असल्याने मदत पोहोचवणे अत्यंत कठीण आहे. भूकंपाच्या धक्क्यांचा परिणाम पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि पंजाब प्रांतांपर्यंत जाणवला, तर हिंदुस्थानातील गुरुग्राममध्येही भूकंपाचे हलके धक्के जाणवले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता  गर्दीचे व्यवस्थापन होणार, सोयी-सुविधा मिळणार भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता गर्दीचे व्यवस्थापन होणार, सोयी-सुविधा मिळणार
श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडय़ाच्या अनुषंगाने कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी-सुविधा पुरविण्यासाठी तयार केलेल्या 288.17 कोटींच्या विकास आराखडय़ास...
सांगलीतील 10 हजारांवर शिक्षक चौकशीच्या फेऱ्यात; कागदपत्रे जमविण्यासाठी धावपळ
425 कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची दिल्ली, पुण्यात छापेमारी
विनापरवाना घोडागाडी शर्यत; चौघांवर गुन्हा
पालघरमध्ये 49 धोकादायक इमारतींवर यमाचा दबा, विरारची पुनरावृत्ती झाल्यास याला जबाबदार कोण? नोटीस दिल्यानंतरही इमारती रिकाम्या नाहीत
आता हद्दच झाली, पोलिसाने जपानी पर्यटकाकडून घेतली एक हजाराची लाच
पाकिस्तानातील पूर हा अल्लाहचा आशीर्वाद! बादल्या भरून ठेवा!! संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे अजब विधान