मुंबईत पावसाचा जोर कायम, मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरू

मुंबईत पावसाचा जोर कायम, मध्य रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरू

मुंबई आणि उपनगरांमध्ये मागील २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शहराची जीवनवाहिनी असलेल्या मध्य रेल्वेच्या वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने सीएसएमटी-ठाणे आणि सीएसएमटी माखुर्द सेवा बंद ठेवण्यात आली होती. मात्र आता पाण्याचा काही प्रमाणात निचरा झाल्याने लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी लोकल गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ५:३० वाजेपर्यंत मिठी नदीच्या पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा १० मीटरवर पोहोचल्याने सायन, कुर्ला, माटुंगा, आणि दादरसह अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचले. यामुळे मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावरील लोकल गाड्या ३० ते ४० मिनिटे उशिराने धावत आहेत, तर काही मार्गांवर सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे.

मुंबईच्या प्रमुख स्थानकांवर, विशेषत: सीएसएमटी, ठाणे, आणि कल्याण येथे प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अनेक प्रवाशांना तासंतास थांबावे लागत असून, काहींनी पर्यायी वाहतूक साधनांचा वापर केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात
>> विजय जोशी सन 1983 व 89 साली त्यावेळच्या बिलोली, देगलूर व धर्माबाद या तालुक्यात झालेली अतिवृष्टी आणि पोचमपाड अर्थात...
Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
Nanded – गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कार ट्रकला धडकून तिघांचा मृत्यू
ओबीसींवर अन्याय झाला तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का? संजय राऊत यांचा सवाल
कापसाला कीड, सोयाबीनवर ‘उंट अळी’चा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत भर
वाशीला जे गुलाल उधळत होते त्यांना फडणवीसांनी साधं चर्चेतही घेतलं नाही, संजय राऊत यांचा टोला
धोकादायक सभा अपार्टमेंट खचली; नालासोपाऱ्यातील 40 कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवले