देशभरात पावसाचा कहर: पंजाबमध्ये 29 मृत्यू, 12 जिल्ह्यांत पूर; हिमाचलमध्ये भूस्खलन

देशभरात पावसाचा कहर: पंजाबमध्ये 29 मृत्यू, 12 जिल्ह्यांत पूर; हिमाचलमध्ये भूस्खलन

हवामान विभागाने (IMD) देशभरात मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर, भूस्खलन आणि वादळी वाऱ्यांसाठी काही राज्यात रेड अलर्ट जारी केला आहे. पंजाबमधील १२ जिल्ह्यांत पूरस्थिती असून, २९ लोकांचा मृत्यू झाला आहे.

हिमाचल प्रदेशात ऑगस्ट महिन्यात ६८ टक्क्यांहून अधिक पाऊस पडला असून, १९४९ नंतरचा सर्वाधिक रेकॉर्ड मोडला गेला. दिल्लीत यमुना नदीचे पाणी वाढले आहे. उत्तराखंडात शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळमध्येही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मुसळधार पावसामुळे उत्तर हिंदुस्थानात प्रचंड नुकसान झाले आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि दिल्ली येथे पूर आणि भूस्खलनाचा सामना करावा लागत आहे. पंजाबमध्ये १,३१२ गावे प्रभावित झाली असून, २.५६ लाख लोकांना याचा फटका बसला आहे. हिमाचलमध्ये १,२७७ रस्ते बंद पडले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता  गर्दीचे व्यवस्थापन होणार, सोयी-सुविधा मिळणार भीमाशंकर विकास आराखड्यास मान्यता गर्दीचे व्यवस्थापन होणार, सोयी-सुविधा मिळणार
श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडय़ाच्या अनुषंगाने कुंभमेळा 2027च्या पार्श्वभूमीवर गर्दी व्यवस्थापन व इतर सोयी-सुविधा पुरविण्यासाठी तयार केलेल्या 288.17 कोटींच्या विकास आराखडय़ास...
सांगलीतील 10 हजारांवर शिक्षक चौकशीच्या फेऱ्यात; कागदपत्रे जमविण्यासाठी धावपळ
425 कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीची दिल्ली, पुण्यात छापेमारी
विनापरवाना घोडागाडी शर्यत; चौघांवर गुन्हा
पालघरमध्ये 49 धोकादायक इमारतींवर यमाचा दबा, विरारची पुनरावृत्ती झाल्यास याला जबाबदार कोण? नोटीस दिल्यानंतरही इमारती रिकाम्या नाहीत
आता हद्दच झाली, पोलिसाने जपानी पर्यटकाकडून घेतली एक हजाराची लाच
पाकिस्तानातील पूर हा अल्लाहचा आशीर्वाद! बादल्या भरून ठेवा!! संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे अजब विधान