माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सरकारी बंगला केला रिकामी

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सरकारी बंगला केला रिकामी

माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सरकारी बंगला रिकामी केला आहे. पदाचा राजीनामा दिल्यानंतर सहा आठवड्यांनंतर ते दक्षिण दिल्लीतील छतरपूर भागात असलेल्या एका खाजगी फार्महाऊसमध्ये शिफ्ट झाले आहेत. हा फार्महाऊस इंडियन नॅशनल लोकदल (INLD) नेते अभय चौटाला यांचा आहे, जो गडईपूर परिसरात आहे. धनखर यांना टाईप-८ सरकारी निवासाची व्यवस्था होईपर्यंत ते येथे राहणार आहेत.

जगदीप धनखड यांनी २१ जुलै रोजी आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट २०२७ पर्यंत होता. परंतु त्यांनी मान्सून सत्राच्या पहिल्याच दिवशी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, आवास आणि शहरी विकास मंत्रालयाकडून धनखड यांच्याकडून सरकारी बंगल्यासाठी कोणतीही औपचारिक विनंती प्राप्त झालेली नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. “धनखर हे तात्पुरत्या स्वरूपात या खासगी फार्महाऊसमध्ये राहणार आहेत, जोपर्यंत त्यांना टाईप-८ अधिकृत निवास मिळत नाही,” असे ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हसण्याने खरंच आयुष्य वाढतं? अन् लवकर म्हातारपणही येत नाही? विज्ञान आणि आयुर्वेदाने सांगितलेलं सत्य जाणून आश्चर्य वाटेल हसण्याने खरंच आयुष्य वाढतं? अन् लवकर म्हातारपणही येत नाही? विज्ञान आणि आयुर्वेदाने सांगितलेलं सत्य जाणून आश्चर्य वाटेल
नेहमी हसत राहावं,त्यामुळे मन तर खुश राहतं शिवाय आरोग्यही सुधारत, आयुष्य वाढतं असं आपण अनेकदा ऐकलं असेल. पण खरंच असं...
सकाळी रिकाम्या पोटी दुधासोबत शिळी चपाती खाणे हा या लोकांसाठी लाभदायी
Solapur News – उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, पंढरपूरात चंद्रभागेतील मंदिरांना पाण्याचा वेढा
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी ‘या’ डाळीचे करा सेवन, शरीराला मिळतील अनेक फायदे
सुप्रीम कोर्टाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांचे निधन
Ratnagiri News – अर्बन बॅंक संशयाच्या भोवऱ्यात, राजापूर शाखेतून 100 कोटींच्या ठेवी काढल्या
भरधाव ट्रकने 10 ते 15 जणांना चिरडले, दोघांचा मृत्यू; अनेक वाहनांना धडक