Hair Care – केसगळतीवर लिंबाचा वापर कसा करायला हवा, वाचा

Hair Care – केसगळतीवर लिंबाचा वापर कसा करायला हवा, वाचा

केसगळती ही समस्या दिवसागणिक भेडसावु लागली आहे. केसगळतीमुळे सौंदर्यातही बाधा येते. म्हणुनच केसगळतीची सुरुवात झाल्यावरच त्यावर उपाय करणे हे गरजेचे आहे. केसगळतीवर कोणतेही महागडे केमिकलचे उपाय करण्यापेक्षा, साधे सोपे उपाय केव्हाही हितावह ठरतात.

महिलांच्या सौंदर्यामध्ये केसांचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे. अनेकदा धुळीमुळे, प्रदुषणामुळे केस गळणे, कोरडे पडण्यास सुरुवात होते. केसांचे आरोग्य हे मुख्यतः आपण काय आणि कोणता आहार घेतो यावर अवलंबून असते. केसांची काळजी घेण्यासाठी तेलाचा उपयोग खूप मोलाचा मानला जातो. तेलाच्या जोडीने आपल्या घरातील अगदी सहज उपलब्ध असलेले केसांच्या त्वचेसाठी आवश्यक असणारे पदार्थही खूप महत्त्वाचे आहेत. साधे घरगुती उपाय आपण अमलात आणून केसांचे आरोग्य चांगले ठेऊ शकतो. केसांना सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून आपण  मास्क लावून केसगळती थांबवू शकतो. घरगुती उपाय केसांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडतात.

Hair Care – केसगळतीकडे दुर्लक्ष करु नका, वाचा यामागील महत्त्वाची कारणे

केसगळतीवर साधे सोपे घरगुती उपाय खास तुमच्यासाठी

केसगळती रोखण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे लिंबू. एक कप कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळा. आंघोळीच्या आधी हे लिंबाचे मिश्रण केसांमध्ये व्यवस्थित लावा. त्यानंतर केस  20 ते 25 मिनिटांनंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा.

ऑलिव्ह ऑईलमध्ये थोडेसे दही मिसळा आणि केसांच्या मूळाशी लावावे. केसांना चमक आणण्यासाठी ऑलिव्ह तेल सर्वोत्तम पर्याय  आहे.

Hair Care – केसातील कोंड्यावर ‘हा’ आहे जालिम उपाय, वाचा

केसांचा चिकटपणा आणि तेलकटपणा घालविण्यासाठी लिंबाचा रस केसांच्या मूळाशी लावावा.  हा रस लावल्यानंतर किमान 15 मिनिटे तसाच ठेवावा. त्यानंतर केस स्वच्छ धुवावे.

केसांच्या आरोग्यासाठी दही सुद्धा खूप फायदेशीर आहे. दह्यामध्ये केसांसाठी आवश्यक असणारी खनिजे असतात. तसेच केसांचा कोरडेपणाही दह्याच्या वापराने दूर होतो. अंघोळ करण्याआधी केसांना किमान 10 मिनिटे दही लावून ठेवावे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात
>> विजय जोशी सन 1983 व 89 साली त्यावेळच्या बिलोली, देगलूर व धर्माबाद या तालुक्यात झालेली अतिवृष्टी आणि पोचमपाड अर्थात...
Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
Nanded – गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कार ट्रकला धडकून तिघांचा मृत्यू
ओबीसींवर अन्याय झाला तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का? संजय राऊत यांचा सवाल
कापसाला कीड, सोयाबीनवर ‘उंट अळी’चा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत भर
वाशीला जे गुलाल उधळत होते त्यांना फडणवीसांनी साधं चर्चेतही घेतलं नाही, संजय राऊत यांचा टोला
धोकादायक सभा अपार्टमेंट खचली; नालासोपाऱ्यातील 40 कुटुंबीयांना सुरक्षितस्थळी हलवले