21 हजार शासकीय वाहने भंगारात; जुन्या मोटारींच्या जागी आता नवीन मोटारी धावणार

21 हजार शासकीय वाहने भंगारात; जुन्या मोटारींच्या जागी आता नवीन मोटारी धावणार

राज्य शासनाच्या सेवेत असलेली पंधरा वर्षांपेक्षा अधिक वयाची तब्बल 21 हजार वाहने आतापर्यंत भंगारात काढण्यात आली आहेत. त्यामुळे आता या वाहनांच्या जागी इंधनात बचत करणारी आणि प्रदूषण कमी करणारी वाहने शासकीय सेवेत दाखल करून घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्यातील वाहनांचे प्रदूषण कमी करण्याबरोबरच वाहनांच्या सुरक्षितेत वाढ, इंधनाची कार्यक्षमता सुधारणे, वाहनांच्या देखभालीचा खर्च कमी करणे, जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणण्यासाठी राज्यातील शासकीय, निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक परिवहन उपक्रमातील 15 वर्षांपेक्षा अधिक जुनी वाहने भंगारात (निष्काषित) काढण्याचे नियम जारी झाले आहेत. ही वाहने भंगारात काढल्यावरच नवीन वाहने खरेदी किंवा भाडेतत्त्वावर घेता येतील असा सरकारी नियम आहे. याअंतर्गत पंधरा वर्षांपेक्षा अधिक जुनी सुमारे तेरा हजार वाहने शासकीय सेवेत होती. ही सर्व वाहने या वर्षीच्या जानेवारी महिन्यापर्यंत भंगारात काढण्यात येणार होती. अशा प्रकारे आतापर्यंत 21 हजारांहून अधिक वाहाने भंगारात काढली आहेत.

1800 ट्रक भंगारात

आतापर्यंत सुमारे एक हजार 812 ट्रक भंगारात काढले आहेत. त्यात पेंद्र सरकारचे 388, राज्य सरकारचे 1 हजार 325 आणि पोलीस खात्याचे 99 ट्रक भंगारात गेले आहेत. तर 2 हजार 107 बसेस भंगारात काढल्या. त्यात राज्य सरकारच्या अखत्यारीतील 1 हजार 941 ट्रकचा समावेश आहे. त्याशिवाय पोलीस खात्याच्या 3 हजार 97 वाहानांचा समावेश आहे. या नियमाअंतर्गत दुचाकी, मोटारी आगीचे बंब, रुग्णवाहिका, जीप यांचाही समावेश आहे. अशा प्रकारे आतापर्यंत 21 हजार 648 विविध वाहने भंगारात काढण्यात आली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं
अनेकांना झोपण्याआधी अंघोळ करण्याची किंवा सकाळी काही नाश्ता करून मग थोड्यावेळाने अंघोळ करण्याची सवय असते. पण काहीजण कधी कधी काही...
Video नांदेडमधील प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनाची वाट खडतर, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे भाविकांचे हाल
GSTच्या नावाखाली मध्यमवर्गीयांची कमाई चुरून खाल्ल्यावर आता केंद्राला बदल करण्याचे सुचले, अंबादास दानवे यांची टीका
नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात
Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
Nanded – गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कार ट्रकला धडकून तिघांचा मृत्यू
ओबीसींवर अन्याय झाला तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का? संजय राऊत यांचा सवाल