Asia Cup 2025 – खेळाडूंना अवाक्षरही बोलू नका, कारण.., पाकिस्तानविरुद्धच्या लढतीवरील टीकेमुळे गावस्कर संतापले

Asia Cup 2025 – खेळाडूंना अवाक्षरही बोलू नका, कारण.., पाकिस्तानविरुद्धच्या लढतीवरील टीकेमुळे गावस्कर संतापले

आशिया चषक 2025 साठी हिंदुस्थानची घोषणा झाली आहे. सूर्यकुमार यादव कर्णधार तर शुभमन गिल उपकर्णधार आहे. गिलच्या निवडीवरून वाद सुरू असतानाच आशिया चषकात हिंदुस्थान 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळणार यावरून टीका सुरू झाली आहे. याबाबत आता माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून खेळाडूंवर टीका करू नका असे आवाहन त्यांनी केले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यापासून हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती आहे. याच पार्श्वभूमीवर आशिया चषकावर बहिष्कार टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नुकत्याच झालेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स स्पर्धेत हिंदुस्थानच्या अनेक खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे दोन्ही देशातील सामनाही रद्द झाला होता.

आता आशिया चषकातही हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशी मागणी होत आहे. मात्र हा निर्णय सरकारचा असून खेळाडू यात हस्तक्षेप करू शकत नाही. खेळाडू फक्त बीसीसीआय आणि केंद्र सराकरच्या सूचनांचे पालन करतात, असे गावस्कर यांनी म्हटले आहे. सरकारने जर निर्णय घेतला असेल, तर खेळाडूंवर टीका करण्याचा काहीही प्रश्नच नाही. कारण खेळाडू बीसीसीआयशी करारबद्ध असतात आणि त्यांना केंद्र सरकारकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करावे लागते. त्यामुळे हा निर्णय पूर्णपणे सरकारवर अवलंबून असतो, असे गावस्कर म्हणाले.

खेळाडूंना पाकिस्तानविरुद्धचा सामना खेळण्यास नकार द्यावा का? असे विचारले असता गावस्कर म्हणाले की, हा निर्णय पूर्णपणे केंद्र सरकारवर अवलंबून आहे. सरकार बीसीसीआयला काय करायचे ते सांगेल. या प्रकरणात खेळाडू अगदी असहाय्य आहेत. त्यांची निवड आशिया चषकासाठी झाली आहे. सरकार म्हणेल खेळायचे आहे, तर त्यांना खेळावे लागेल. सरकारने जर न खेळण्याचा आदेश दिला, तर बीसीसीआय त्याप्रमाणे कारवाई करेल, असेही गावस्कर यांनी स्पष्ट केले.

अय्यरवर अन्याय झालाय! आशिया कप संघातून वगळल्यानंतर दिग्गज क्रिकेटपटू श्रेयस अय्यरच्या पाठीशी

दरम्यान, 9 सप्टेंबर पासून आशिया चषकाला सुरुवात होणार आहे. हिंदुस्थान आपला पहिला सामना 10 सप्टेंबरला यूएईविरुद्ध खेळेल. त्यानंतर 14 सप्टेंबरला हिंदुस्थान-पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये सामना रंगणार आहे. तर गटातील शेवटचा सामना हिंदुस्थान 19 सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध खेळेल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं जेवणानंतर लगेच आंघोळ का करू नये? ही सवय तुमचं नुकसान करू शकते, किती वेळाचं अंतर असावं
अनेकांना झोपण्याआधी अंघोळ करण्याची किंवा सकाळी काही नाश्ता करून मग थोड्यावेळाने अंघोळ करण्याची सवय असते. पण काहीजण कधी कधी काही...
Video नांदेडमधील प्रसिद्ध गणपतीच्या दर्शनाची वाट खडतर, खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्यामुळे भाविकांचे हाल
GSTच्या नावाखाली मध्यमवर्गीयांची कमाई चुरून खाल्ल्यावर आता केंद्राला बदल करण्याचे सुचले, अंबादास दानवे यांची टीका
नांदेड जिल्ह्यातील 110 गावांचे भवितव्य पाण्यात
Shikhar Dhawan ED Notice – शिखर धवनला ED ची नोटीस, मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीला हजर राहण्याचे निर्देश
Nanded – गणपतीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कार ट्रकला धडकून तिघांचा मृत्यू
ओबीसींवर अन्याय झाला तर भुजबळ राजीनामा देणार आहेत का? संजय राऊत यांचा सवाल