पोलिसांचा दरारा संपला… ठाण्यात तरुणावर विळ्याने हल्ला

पोलिसांचा दरारा संपला… ठाण्यात तरुणावर विळ्याने हल्ला

जरीमरी मातेच्या पालखी मिरवणुकीत झालेला वाद विकोपाला जाऊन दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना गोकुळनगरमधील हनुमान मंदिर परिसरात घडली. धक्कादायक म्हणजे यावेळी एका माथेफिरू तरुणाने दुसऱ्या गटातील तरुणांवर विळ्याने हल्ला केला. या हाणामारीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून याप्रकरणी राबोडी पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. रोज घडणाऱ्या या गुंडगिरीमुळे ठाणे पोलिसांचा दरारा संपल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.

कपिल कुंभार, मयूर सरकार, साहिल धायबर हे तिघेही लाल मैदानाच्या बाजूला असलेल्या धर्मवीर कट्ट्यावर गप्पा मारत बसले होते. यावेळी त्याच परिसरात राहणारे यश मोरे, साहिल सावंत, गणेश शेलार व शिरीष कांबळे हे चौघे तेथे आले. त्यांनी मिरवणूक संपल्यानंतर मारामारी करायला आला होता का, असा जाब विचारत तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. यावेळी कपिल व त्याच्या मित्रांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्या चौघांनी त्यांना लाकडी फळी व घरगुती विळ्याने मारहाण करून जखमी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चवीला गोड, तरीही मधुमेहाचे रुग्ण खाऊ शकतात ‘ही’ 4 फळे, रक्तातील साखर राहील नियंत्रणात चवीला गोड, तरीही मधुमेहाचे रुग्ण खाऊ शकतात ‘ही’ 4 फळे, रक्तातील साखर राहील नियंत्रणात
आजच्या धावपळीच्या जीवनात तसेच बदलत्या जीवनशैलीत लोकं त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत. त्यामुळे वाढत्या वजनाच्या समस्येसोबतच हृदयरोग आणि...
दातांचं आरोग्य वाचवायचंय? मग गोड पेयांबाबत घ्या ‘ही’ खबरदारी
फायबरच्या कमतरतेमुळे आतड्यांना निर्माण होऊ शकतो धोका, ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष
Haircare Tips: आठवड्यातून किती दिवसांनी केस धुवावेत? जाणून घ्या स्कॅल्पशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, सुरक्षा दलाच्या गोळीबारात चार नक्षलवादी ठार
घरातल्या या गोष्टींमुळे होऊ शकतो कॅन्सर, जाणून घ्या सविस्तर…
मिंधे-भाजप मंत्र्यांमध्ये ‘पत्रयुद्ध’; मिंध्यांनो लक्षात ठेवा गाठ कुणाशी आहे