राज्यात पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मकरंद देशमुख यांची मंत्रालयात नियुक्ती

राज्यात पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मकरंद देशमुख यांची मंत्रालयात नियुक्ती

राज्यात पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. ओम प्रकाश बकोरिया हे सामाजिक विभागाचे आयुक्त होते. त्यांची बदली पुण्यात महाऊर्जा विकास अभिकरण इथे करण्यात आली आहे. अमगोथू श्री रंग नाईक हे कुटुंब कल्याण विभागाचे आयुक्त होते. त्यांची बदली मुंबईतल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सचिवपदी करण्यात आली आहे.

तसेच कादंबरी बालकवडे यांची नियुक्ती मुंबईत कुटुंब कल्याण विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. मकरंद देशमुख यांच्याकडे हाफकीन बायो फार्मा कॉर्पोरेशनची जबाबदारी होती. त्यांची बदली होऊन मुंबईत मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील महिंद्रकर यांची नियुक्ती हाफकीन संस्थेच्या व्यपस्थापकीय संचालकापदी नियुक्ती झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;