चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेसाठी RCB जबाबदार; लवादाचा महत्त्वपूर्ण निर्णय

चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेसाठी RCB जबाबदार; लवादाचा महत्त्वपूर्ण निर्णय

केंद्रीय लवादाने 4 जून रोजी बेंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेसाठी RCB ला जबाबदार धरले आहे. RCB ने पोलिसांच्या परवानगीशिवाय सोशल मीडियावर अचानक विजय मिरवणूक काढल्याची घोषणा केली. त्यामुळे लाखो लोकांची गर्दी झाली. या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. लवादाने म्हटले आहे की, प्रथमदर्शनी असे दिसते की सुमारे तीन ते पाच लाख लोकांच्या गर्दीला आरसीबी जबाबदार आहे. आरसीबीने पोलिसांकडून योग्य परवानगी किंवा संमती घेतली नव्हती. अचानक सोशल मीडियावर माहिती पोस्ट करण्यात आली आणि त्यामुळे लोक जमले.

आरसीबीने समारंभाची अचानक घोषणा करणे म्हणजे अव्यवस्था निर्माण करणे, असे म्हटले आहे. आरसीबीने कोणत्याही पूर्वपरवानगीशिवाय अचानक या प्रकारे घोषणा करून अव्यवस्था निर्माण केली. घोषणेनंतर फक्त 12 तासांत पोलिस नियमांनुसार सर्व आवश्यक व्यवस्था करू शकतील, अशी अपेक्षा करता येत नाही, असे लवादाने स्पष्ट केले आहे.

आरसीबीने आयपीएलच्या पहिल्या विजयानंतर 4 जून रोजी सोशल मीडियावर विजयी मिरवणूक काढण्याची घोषणा केली होती. पोलीस देखील माणसे आहेत. ते देव किंवा जादूगार नाहीत आणि त्यांच्याकडे अलाउद्दीनचा दिव्यासारखे कोणतेही जादूई उपकरण नाही जे बोट फिरवून कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते. पोलिसांना तयारीसाठी पुरेसा वेळ देण्यात आला नव्हता. 4 जून 2025 रोजी वेळेअभावी, पोलिसांना आवश्यक व्यवस्था करता आली नाही. पोलिसांना पुरेसा वेळ मिळाला नाही. बेंगळुरूच्या एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांच्या निलंबनाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान ही टिप्पणी करण्यात आली.

3 आणि 4 जूनच्या रात्री मोठ्या संख्येने लोक आधीच उपस्थित होते. ज्यांना हाताळण्यात पोलीस गुंतले होते. तसेच, विधान सौधा येथे राज्य सरकारकडून आणखी एक कार्यक्रम आयोजित केला जात होता, ज्यामुळे पोलिस दलावर अधिक दबाव निर्माण झाला. अशा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि आवश्यक व्यवस्था करण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ आणि पूर्व माहिती दिली पाहिजे होती, जी या प्रकरणात देण्यात आली नाही, असेही लवादाने म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पाकिस्तान बनला UNSC चा अध्यक्ष! हिंदुस्थानसाठी चिंतेची बाब? पाकिस्तान बनला UNSC चा अध्यक्ष! हिंदुस्थानसाठी चिंतेची बाब?
मंगळवारी पाकिस्तान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा (UNSC) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये पाकिस्तानची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा...
कृपया आम्हाला जगू द्या… आठ वर्षाच्या बालकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे भावनिक विनंती, प्रकरण काय?
‘आय लव्ह यू’ म्हणणे गुन्हा नाही; हायकोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण
Maharashtra Monsoon Session 2025 : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी गदारोळ; विरोधकांचा सभात्याग
Photo – अकलुज येथे संत तुकारम महाराज पालखीचा रिंगण सोहळा भक्तीभावात संपन्न
तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू; अनेक जखमी
Ratnagiri News: रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेल्या तरूणीचे नाशिक कनेक्शन? बेपत्ता तरुणीचे वडील उद्या रत्नागिरीत येणार