वारकऱ्यांवर हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासण्याची घटना – अनिल परब

वारकऱ्यांवर हल्ला म्हणजे महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासण्याची घटना – अनिल परब

पुणे जिह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगने आज पहाटे थेट पंढरपूरच्या पवित्र वारीत हैदोस घालत वारकऱ्यांना लक्ष्य केले. वारकऱ्यांच्या गळ्याला कोयते लावून त्यांना लुटले. यावरून राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून राज्यभरात त्यावरून संताप व्यक्त होत आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनिल परब यांनी हा विषय विधानपरिषदेत मांडत सरकारने सर्व गोष्टी बाजूला ठेवून सर्वप्रथम महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा घ्यावी, अशी मागणी अनिल परब यांनी केली.

”पुणे जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गँगने पंढरपूरच्या पवित्र वारीत हैदोस घालत वारकऱ्यांना लक्ष्य केले. वारकऱ्यांच्या गळ्याला कोयते लावून त्यांना लुटले. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचे अक्षरश: धिंडवडे निघाले आहेत. इतकी वाईट परिस्थिती कायदा व सुव्यवस्थेची झालेली आहे. वारीची महाराष्ट्राला परंपरा आहे. वारीसाठी महाराष्ट्र ओळखला जातो. वारकरी इश्वराच्या भक्तीसाठी या वारीत समाविष्ट होतात. अशा या वारीला गालबोट लावण्याचं काम या महाराष्ट्रात घडलं आहे. कोयता गँगचा हैदोस असा सुरू आहे की ते आता वारकऱ्यांपर्यंत येऊन पोहोचले आहेत. श्रीमंतांना लुटतायत, बिल्डरांना लुटतायत, गँगवार होतेय, राजकीय बळी घेतले जातायत. पण वारकऱ्यांवर हल्ला होतोय व त्याबाबतीत अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. महाराष्ट्राच्या परंपरेला काळीमा फासण्याची, घाला घालण्याची घटना काल घडली आहे. सरकारचा दरारा नाही. कोण कोणाला घाबरत नाही. गुंड मोकाट सुटले आहेत. त्यामुळे सरकारने सर्व गोष्टी बाजूला ठेवून सर्वप्रथम महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा घ्यावी”, अशी मागणी अनिल परब यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कृपया आम्हाला जगू द्या… आठ वर्षाच्या बालकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे भावनिक विनंती, प्रकरण काय? कृपया आम्हाला जगू द्या… आठ वर्षाच्या बालकाची जिल्हाधिकाऱ्यांकडे भावनिक विनंती, प्रकरण काय?
आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. रस्ता रुंदीकरणासाठी जेवणाची गाडी हटवल्याने एका आठ वर्षीय मुलाने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव...
‘आय लव्ह यू’ म्हणणे गुन्हा नाही; हायकोर्टाचे महत्वपूर्ण निरीक्षण
Maharashtra Monsoon Session 2025 : महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दुसऱ्या दिवशी गदारोळ; विरोधकांचा सभात्याग
Photo – अकलुज येथे संत तुकारम महाराज पालखीचा रिंगण सोहळा भक्तीभावात संपन्न
तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू; अनेक जखमी
Ratnagiri News: रत्नदुर्ग किल्ल्यावरून पडलेल्या तरूणीचे नाशिक कनेक्शन? बेपत्ता तरुणीचे वडील उद्या रत्नागिरीत येणार
Mumbai News – बाईकवरून ट्रिपल सीट पिकनिकला चालले होते, वाटेत भीषण अपघातात दोघांचा मृत्यू एक जखमी