Mumbai News – बाईकवरून ट्रिपल सीट पिकनिकला चालले होते, वाटेत भीषण अपघातात दोघांचा मृत्यू एक जखमी

Mumbai News – बाईकवरून ट्रिपल सीट पिकनिकला चालले होते, वाटेत भीषण अपघातात दोघांचा मृत्यू एक जखमी

बाईकवरून ट्रिपल सीट पिकनिकला जात असताना बाईकला अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील गोराई परिसरात मंगळवारी सकाळी हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

मिळालेल्या माहितीनुसार, तिघेही तरुण सायन कोळीवाडा येथील रहिवासी आहेत. तिघे गोराई येथे पिकनिकसाठी आले होते. यावेळी वैराल तलावाजवळील रस्त्यावर पाणी साचल्याने त्यांची दुचाकी घसरली. दुचाकीचालकाला गाडी नियंत्रित करता आली नाही. यामुळे अपघात झाला आणि दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर तिसरा गंभीर जखमी झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;