शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला म्हणून निलंबीत करण्याचा भयानक पायंडा या सरकारने पाडलाय, आदित्य ठाकरे यांची टीका

शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला म्हणून निलंबीत करण्याचा भयानक पायंडा या सरकारने पाडलाय, आदित्य ठाकरे यांची टीका

परतूर येथील भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांना उद्देशून एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्याविरोधात आज विरोधी पक्षाकडून स्थगन प्रस्ताव मांडण्यात येणार होता. मात्र विधानसभा अध्यक्षांनी त्याची परवानगी न दिल्याने सभागृहात गोंधळ झाला. त्यानंतर नाना पटोले यांनी वेलमध्ये उतरून विधानसभा अध्यक्षांना जाब विचारला. त्यानंतर त्यांना एक दिवसासाठी निलंबित करण्यात आले आहे. त्याविरोधात विरोधकांनी आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते नेते व विधिमंडळ पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी विधानभवनात माध्यमांशी संवाद साधला.

‘बबनराव लोणीकरांनी जे काही भयानक शब्द बळीराजासाठी वापरले आहेत. असे शब्द आपण कधी उच्चारू शकत नाही. असे कधी विचार मनात येत नाही. आज आम्ही स्थगन प्रस्ताव मांडत असताना त्यांच्या वतीने कुणीतरी किंवा लोणीकरांनी स्वत: शेतकऱ्यांची माफी मागितली असती तर विषय तिथेच संपला असता. पण स्थगन प्रस्ताव मांडू न देणं. त्याच्यावर काही बोलायचं नाही. याचा अर्थ बबनराव लोणीकर यांच्या मताशी सरकार आणि भाजप सहमत आहे. त्याविरोधात आम्ही आंदोलन सुरू केलं. त्यानंतर नाना पटोलेंना निलंबित केलं आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले की, ”धक्कादायक गोष्ट ही आहे की शेतकऱ्यांसाठी आवाज उठवण्यासाठी नाना पटोलेंना निलंबित केलेलं आहे. हा भयानक पायंडा या सरकारने पाडला. हे सरकार शेतकऱ्यांच्या आशिर्वादाने नाही तर निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे. शेतकऱ्यांना ज्या आधी तुम्ही वचनं दिली ती न पाळता, त्यांचा अपमान करून तुम्हाला सत्ताधारी बाकावर बसता येतं हे सरकारने दाखवून दिलेलं आहे. नाना पटोलेंचं जे निलंबन झालं आहे त्यामुळे आम्ही आजच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे, असे देखील ते म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;