अहिल्यानगरमधून धावणार एसटीच्या 250 जादा बस; आषाढी वारीसाठी नियोजन

अहिल्यानगरमधून धावणार एसटीच्या 250 जादा बस; आषाढी वारीसाठी नियोजन

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एसटी महामंडळाने 250 जादा बसची व्यवस्था केली आहे. तारकपूर बसस्थानकातून 2 जुलैपासून जादा बस पंढरपूरसाठी धावणार आहेत. प्रवाशांसाठी महामंडळाने ज्या सवलती दिलेल्या आहेत, त्या सर्व सवलती या जादा बसलादेखील लागू असणार आहेत. दरम्यान, सध्या दररोज दहा ते बारा बस पंढरपूर वारीसाठी सुरू आहेत, अशी माहिती एस. टी. विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी दिली आहे.

6 जुलैला आषाढी एकादशी आहे. यानिमित्ताने पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी जिल्हाभरातून भाविक जात आहेत. या भाविकांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदादेखील महामंडळाच्या अहिल्यानगर विभागाच्या वतीने 250 जादा बसचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी आगारनिहाय बसची व्यवस्था केली आहे. संगमनेर, श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले, नेवासा आदी आगारांच्या बस तारकपूर बसस्थानकामार्गे पंढरपूरला जाणार आहेत. तारकपूर आगारातून 40 जादा बसचे नियोजन आहे. याशिवाय धुळे आणि जळगाव येथून येणाऱया बसदेखील तारकपूरमार्गे पंढरपूरला रवाना होणार आहेत. पंढरपूर वारीसाठी 10 जुलैपर्यंत बस धावणार आहेत.

…तर थेट गावातून बसची व्यवस्था

पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणारे 44 भाविक एकाच गावातील असल्यास आणि त्यांनी मागणी केल्यास बस थेट त्या गावात पाठवली जाणार आहे. या भाविकांना पंढरपूर नेणे आणि दर्शन आटोपल्यानंतर थेट घरी सोडण्याची जबाबदारी एसटी महामंडळाची असणार आहे. गावासाठी स्पेशल बस हवी असल्यास एसटी आगारप्रमुखांशी संपर्क साधावा, असे आवाहन एस. टी. विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एक्सपायर झालेली ही 17 औषधे कचऱ्यात नाही थेट टॉयलेटमध्ये फ्लश करा? अन्यथा आरोग्य येईल धोक्यात एक्सपायर झालेली ही 17 औषधे कचऱ्यात नाही थेट टॉयलेटमध्ये फ्लश करा? अन्यथा आरोग्य येईल धोक्यात
अनेकदा आपण आणलेली औषधे आजार बरा झाल्यानंतर वापरली जात नाहीत आणि वर्षानुवर्षे घरातच पडून राहतात. सहसा अशी औषधे कचऱ्याच्या डब्यात...
रिकाम्या पोटी कोमट पाणी का प्यावे? या समस्या होतील दूर
Photo – प्रियाचं मनमोहक सौंदर्य; अनारकली ड्रेसमध्ये दिसतेय कहर!
IND Vs ENG 3rd Test – लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर घडला दुर्मिळ योगायोग, जाणून घ्या एका क्लिकवर
Jammu Kashmir – अमरनाथ यात्रेदरम्यान अनेक बस एकमेकांना धडकल्या, 10 भाविक जखमी
मध्य प्रदेशात 10 फूट उंच पुलावरून कार कोसळली, दोन जणांचा जागीच मृत्यू
Mumbai News – जुन्या वादातून भावांनीच भावाचा काटा काढला, वडाळ्यात तरुणाची निर्घृण हत्या