पाणीटंचाईने पिचलेल्या कुटुंबाचा गळफास घेण्याचा प्रयत्न, नांदेड जिल्ह्यातील उमरीतील थरार

पाणीटंचाईने पिचलेल्या कुटुंबाचा गळफास घेण्याचा प्रयत्न, नांदेड जिल्ह्यातील उमरीतील थरार

सिंधी व सिंधी तांडा येथील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत चालला असून, ग्रामपंचायत किंवा प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने सिंधी तांडा येथील एका ग्रामस्थाने ग्रामपंचायतीसमोर कुटुंबासह गळफास घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी त्या युवकास सोडवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

तालुक्यातील सिंधी तांडा येथील पाणीटंचाईचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला असून, घागरभर पाण्यासाठी महिला विद्यार्थी व नागरिकांना वणवण भटकंती करावी लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिला व मुलांना जीव मुठीत धरून 40 ते 50 फूट खोल विहिरीत उतरावे लागते. सततच्या पाणीटंचाईला वैतागून येथील बंजारा समाजाचे अर्जुन जाधव यांनी आई, पत्नी आणि तीन मुलांसह सिंधी ग्रामपंचायतीसमोर गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा उपस्थित नागरिकांनी त्यांना सोडवले म्हणून मोठी दुर्घटना टळली. याबाबत उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी याबाबत कसली तक्रार किंवा माहिती मिळाली नसल्याचे सांगत हे प्रकरण ग्रामपंचायत स्तरावर सुरू असल्याचे स्पष्ट केले. या भागाचे आमदार राजेश पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्प होऊ शकला नाही.

लाखो रुपयांचा निधी मंजूर, परंतु कामात मोठा भ्रष्टाचार

तांडा वस्तीवरील पाणीपुरवठा योजनेसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला, परंतु झालेल्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याने येथील पाणीपुरवठा योजना निष्फळ झाल्याचा आरोप शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष साहेबराव पाटील पुयड यांनी केला आहे. उमरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही.आर. आरबडवाड यांनी सिंधी गावालगतच्या शेतातील एक बोअर अधिग्रहण करण्याचे आदेश दिले. परंतु, त्या बोअरलाही पाणी नसल्याची खंत पुयड यांनी व्यक्त केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;