सायबरची कारवाई; सोशल मीडियावरील पाच हजार आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या

सायबरची कारवाई; सोशल मीडियावरील पाच हजार आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या

हिंदुस्थान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर समाजमाध्यमांद्वारे त्याबाबत आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱया पोस्ट मोठय़ा प्रमाणात टाकल्या जात आहेत. पण त्याचे गंभीर पडसाद उमटण्याआधीच अशा पाच हजारांहून अधिक आक्षेपार्ह पोस्ट हटविण्याचे काम महाराष्ट्र सायबर विभागाने केले आहे.

पाकिस्तानविरोधात ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यापासून महाराष्ट्र सायबर विभागाने समाजमाध्यमांवर प्रक्षोभक, अफवा व खोटी माहिती पसरवणाऱया पोस्टवर करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली. तेव्हा भडकाऊ, अफवा व खोटी माहिती पसरविणाऱ्या अनेक पोस्ट विविध समाजमाध्यमांवर करण्यात आल्या होत्या. या पोस्टच्या माध्यमातून अनुचित प्रकार किंवा नागरिकांमध्ये चुकीची माहिती जाण्याचा धोका असल्याने महाराष्ट्र सायबरने त्या वेळीच डिलिट केल्या. जवळपास पाच हजार आक्षेपार्ह पोस्ट डिलीट करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

समाजपंटकांकडून खोटय़ा पोस्ट
काही असामाजिक घटकांकडून हल्ल्यांसंबंधीचे फसवे वृत्त पोस्ट करून अनुयायी मिळवणे, घबराट पसरवणे किंवा तणावाचे वातावरण करण्याचे प्रकार केले जात आहेत. या घटनांची नोंद घेत महाराष्ट्र सायबर विभागाने अशा खोटय़ा माहितीच्या प्रसारास थांबवण्यासाठी अनेक नोटिसा जारी केल्या आहेत. तसेच समाजमाध्यमांवरील व कम्युनिकेशन प्लॅटफॉर्मवरून अशी माहिती काढून टाकण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नागरी लष्करी समन्वयाबाबत फडणवीसांच्या उपस्थितीत ‘वर्षा’वर महत्त्वाची बैठक नागरी लष्करी समन्वयाबाबत फडणवीसांच्या उपस्थितीत ‘वर्षा’वर महत्त्वाची बैठक
नागरी लष्करी समन्वयाबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित...
मित्राच्या मेहंदी कार्यक्रमात ‘कांतारा’ फेम अभिनेत्याचं निधन; 33 व्या वर्षी आला हार्ट अटॅक
अमिताभ यांचा 36 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत लिपलॉक सीन; जया बच्चन यांनी संतापून घेतला होता हा निर्णय
‘माझे वडील बेबोसोबत जास्त आनंदी…; सैफ अली खानचा लेक इब्राहिम थेटच म्हणाला
weightloss tips: वजन कमी करताना ‘या’ फळांचे चुकूनही सेवन करू नये, लठ्ठपणा दूर होण्याऐवजी…..
‘मुरांबा’ मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्री होणार एण्ट्री; पहिल्यांदा दिसणार मेडिटेशन हीलरच्या भूमिकेत
टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताच पत्नी अनुष्कासोबत विमानतळावर दिसला विराट; नेटकरी म्हणाले ‘वहिनी थांबवा..’